शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

'...तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका' राज ठाकरेंचा मंत्री सामंत यांना मिश्कील टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 19:37 IST

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आग्रह केल्याने आपण या कार्यक्रमाला आलो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार, २ फेब्रुवारी) पुण्यात सुरू असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावत मराठी भाषा, मराठी माणूस आणि राज्यातील सद्यस्थितीवर परखड भूमिका मांडली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आग्रह केल्याने आपण या कार्यक्रमाला आलो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, मात्र त्याचवेळी आम्ही काही गोष्टी करणार असू, तर तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका, असा मिश्कील टोला त्यांनी मंत्री उदय सामंत यांना लगावला.मराठी अस्तित्वाचा सवालमराठी भाषेचे आणि मराठी माणसाचे भवितव्य धोक्यात असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर निशाणा साधला. “हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय नागरिक असूनही कोणीही जमीन विकत घेऊ शकत नाही. पण महाराष्ट्रात मात्र ‘या आणि आमची जमीन घेऊन जा’ असे चालते” “आमचीच माणसं आमच्या राज्यात बेघर होत असतील, तर त्याला विकास म्हणता येणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी मुंबई आणिमहानगरांतील मराठी लोकांचे घटते प्रमाण हा चिंतेचा विषय असल्याचे म्हंटले.मराठी भाषेचा अभिमान हवा“आपल्या मुलांना मराठीत बोलायला शिकवा. मराठीत विचार करायला लावा. आजकाल आपली मुलं एकमेकांशी हिंदीत बोलतात, हे दुर्दैव आहे,” असे सांगत त्यांनी पालकांनी आपल्या घरातच मराठीचा आग्रह धरला पाहिजे, असे मत मांडले.“जय जय महाराष्ट्र माझा!” म्हणत आपण राज्याचा अभिमान बाळगतो, पण अन्य कोणत्याही राज्यात असे गीत नाही. मग आपल्यालाच आपल्या भाषेचा अभिमान नसेल, तर इतर आपल्याला काय किंमत देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.साहित्य संमेलन आणि वाचनसंस्कृती“नुसती पुस्तके वाचली जाणार नाहीत, कारण आता लोक वाचत नाहीत. जे काही येते ते फक्त व्हॉट्सअ‍ॅपवर!” असे सांगत त्यांनी तरुण पिढीला वाचनसंस्कृती जपण्याचे आवाहन केले. “संमेलनातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने किमान १० पुस्तकं विकत घेतली पाहिजेत,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.जातीपातीच्या राजकारणावर प्रहारआपल्या महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत अडकवू नका. छत्रपती शिवाजी महाराज असोत की छत्रपती संभाजी महाराज, ते सर्वांचे आहेत. महाराष्ट्राने जातीपातीच्या संकुचित मानसिकतेतून बाहेर यायला हवं, असे आवाहन करत त्यांनी समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवले.रितेश देशमुख लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून, संभाजी महाराजांवरही नवीन चित्रपट येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.मराठीच्या लढ्यासाठी मनसेची भूमिकाराज ठाकरे यांनी मनसेच्या आंदोलनशैली आणि मराठी अस्मितेसाठी पक्षाने लढलेल्या लढ्यांवरही भाष्य केले. “जेव्हा आम्ही काही करतो, तेव्हा त्यावर केसेस टाकल्या जातात. पण मराठीसाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करत राहू,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRaj Thackerayराज ठाकरेmarathiमराठीMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनUday Samantउदय सामंत