शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

...तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही" अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:48 IST

कुणाच्या फायद्यासाठी तात्पुरता विचार करून लोकभावना विचारात न घेता कोणाच्यातरी सांगण्यावरून नगरपालिका जाहीर केली

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाची नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय ऑपरेशन केले होते. ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळल्याने राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याने त्यांना नगरपालिका घोषित करण्यात आले. या निर्णयाचा बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर आता अजित पवारांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. पुढील ५० वर्षांचा विचार न करता असा निर्णय घ्यायला लागले तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही असे त यावेळी म्हणाले आहेत. 

फुरसुंगी, उरुळी देवाची गावातील गोडाऊनचा टॅक्स वाढतो किंवा कुणाच्या फायद्यासाठी तात्पुरता विचार करून लोकभावना विचारात न घेता कोणाच्यातरी सांगण्यावरून नगरपालिका जाहीर करून टाकल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

हडपसर येथील अमरसृष्टी हौसिंग सोसायटीच्यावतीने उभारलेल्या ४० किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॉवर जनरेशन प्लांटचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चेतन तुपे, हेमलता मगर, सुनील गायकवाड, नीलेश मगर, प्रशांत जगताप, योगेश ससाणे, डॉ. शंतनु जगदाळे, सोसायटीचे चेअरमन स्वप्नील धर्मे यावेळी उपस्थित होते.

पुणे महापालिकेत २०१७ साली ११ गावे आणि त्यांनतर २३ गावांचा समावेश केला गेला. पालिकेच्या गेल्या निवडणुकीत उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपालिका घाेषित झालेल्या गावात राष्ट्रवादीचे गणेश ढोरे हे नगरसेवक होते. महापालिकेच्या आगामी प्रभागरचनेत या गावामध्ये नगरसेवकांची संख्या वाढली असती. राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त निवडून आले असते. त्याला ब्रेक लावण्यासाठीच भाजप आणि बाळासाहेंबाची शिवसेना यांनी रणनीती तयार करत वरील दोन्ही गावे महापालिकेतून वगळून नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या काळात विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेला आपण प्राधान्य दिले पाहिजे. अमरसृष्टी सोसायटीने हा प्रकल्प राबवून चांगला आदर्श दिला आहे. रहिवाशांनीही आपापल्या बंगल्यावर असे संच बसवून विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. कचरा, सांडपाणी व्यवस्थापन यासारख्या प्रकल्पांवरही सगळ्याच सोसायट्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMuncipal Corporationनगर पालिका