शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्मारकांचा प्रश्न रखडलेलाच, अर्थसंकल्पात तरतूद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 05:35 IST

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, महाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, महाराष्ट्रवाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ला येथे तर ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांचेसिंधुदुर्ग येथे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला असून, पु.ल. आणि गदिमांच्या स्मारकांची दखल न घेण्याच्या राजकीय उदासीनतेमुळे रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतआहे.येत्या ८ नोव्हेंबरपासून पुलंच्या, १ आॅक्टोबरपासून गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाला २३ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. या दिग्गज साहित्यिकांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृती कायम जपण्याच्या उद्देशाने स्मारक उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, सरकारकडून गेल्या अनेक वर्षांमध्ये स्मारकांच्या कामाची दखल घेण्यात आलेली नाही.आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य व चित्रपटसृष्टीत गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांनी मोलाचे योगदान दिले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गदिमांचे स्मारक करू, असे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारतर्फे गदिमा स्मारक समिती नेमण्यात आली. माडगूळकर कुटुंबीयांना विश्वासात न घेता राजकीय दबावापोटी शेटफळे येथे स्मारक करण्यात आले. केवळ काम उरकायच्या उद्देशाने काही बांधकाम उरकण्यात आले. स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवण्यात आले. मात्र, यावर नंतर कोणतेही काम हाती घेण्यात आले नाही.महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि विलेपार्ले यांचे अतूट नाते आहे. पुणे ही तर पुलंची कर्मभूमी. मात्र, तरीही पु. ल. देशपांडे यांचे एकही स्मारक आजवर उभारण्यात आलेले नाही. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या स्मारकाचे काम हाती घेण्याची संधी सरकारकडे होती. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.ंअर्थसंकल्पाने काय दिले?आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधिस्थळावर स्मारक करण्यासाठी संगमवाडी येथे जागा आरक्षित होती. राज्य सरकारने हे आरक्षण कायम केल्याने त्या जागेवर स्मारक उभारणीसाठी १.५ कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे.आद्य क्रांतिवीर उमाजीनाईक स्मारकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापुरुषांचे साहित्य वेब पोर्टलद्वारे प्रकाशित करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला असून, यासाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.पु.ल., गदिमा, गोविंदाग्रज यांचे साहित्यसृष्टीतील योगदान मोलाचे आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, स्मारकाचा विषय जास्त महत्त्वाचा होता. स्मारकांच्या उभारणीचे काम हेच सारस्वतांना अभिवादन ठरले असते.- प्रा. मिलिंद जोशी,कार्याध्यक्ष, मसापअर्थसंकल्पात पु.ल., गदिमा, गोविंदाग्रज यांसारख्या दिग्गजांचे स्मरण ठेवण्याचे भान सरकारला आले, हीच मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातही त्यांचे चाहते आहेत. यादृष्टीने सर्वत्र साहित्यिक उपक्रम राबवले जावेत, अशी अपेक्षा आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्मारकाच्या आराखड्यावर विचार केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात तरतूद करण्यात न आल्याने अपेक्षाभंगाचे दु:ख आहेच.- श्रीधर माडगूळकर

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८