शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच नाही

By admin | Published: October 17, 2015 1:03 AM

बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती.

पुणे : बनावट पट व शाळांचा भंडाफोड ‘सरल’च्या नोंदीमुळे झाला आहे. नोंदीसाठी १५ आॅक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी आज दिवसभर सर्व्हर डाऊन होता. १३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील ९३ शाळांची नोंदच झाली नव्हती. तसेच ३५ हजार ६0८ विद्यार्थी बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, सकाळपासूनच ही वेबसाईट चालूच होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत याची आकडेवारी मिळू शकली नाही. राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना शालेय दस्तऐवज संगणीकृत करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या. यात जिल्ह्यातील एकूण शाळा, चालू शाळा, विद्यार्थी संख्या याचबरोबर सुविधांची माहिती यात भरावयाची होती. ही माहिती भरण्यासाठी १५ आॅक्टोबर ही शेवटची तारीख होती. मात्र आज ही साईटच ओपन झाली नसल्याने बहुतांश शाळांना नोंदीच करता आल्या नाहीत. वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील शाळांची पटसंख्येची माहिती शासनाने मागविली होती. त्यात जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ५ हजार २९३ शाळांमध्ये ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थीसंख्या असल्याचे शिक्षण विभागाने कळविले होते. त्या माहितीच्या अधारे ‘सरल’च्या माध्यमातून आॅनलाईन नोंदी करण्याचे आवाहन शाळांना शासनाने केले होते. १३ आॅक्टोबरपर्यंत या माध्यमातून झालेल्या नोंदींनुसार जिल्ह्यात ५ हजार २00 शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. म्हणजे ९३ शाळांच्या अद्याप नोंदीच झाल्या नाहीत.जर शेवटच्या दोन दिवसांत काही शाळांनी नोंदी केल्या असल्या तरी सुमारे ६0 ते ६५ शाळा या विविध कारणांनी बंद असल्याचे सुत्रांनी सांगितले. यात कमी पटसंख्या हे महत्वाचे कारण आहे. (प्रतिनिधी)>>३५,६०८ विद्यार्थी गायबजिल्ह्यातील ९ लाख ४६ हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख १० हजार ९७५ विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. सुमारे ३५ हजार ६०८ विद्यार्थी गायब आहेत. यातही सर्वाधिक हवेली तालुक्यात २७ हजार २५१, जुन्नरमध्ये ३ हजार ५१६, मुळशीत १ हजार १८४, दौंडमध्ये १ हजार १२४ तर भोरमध्ये १ हजार ११५ विद्यार्थ्यांची नोंदच नाही. इतर तालुक्यांत मावळमध्ये ९६७, आंबेगावमध्ये ९४३, खेडमध्ये ५४६, शिरूरमध्ये ४४०, विद्यार्थ्यांच्या नोंदी नाहीत., तर इंदापूर तालुक्यात शाळांची संख्या कमी होऊनही विद्यार्थिसंख्या १ हजार २४ नी वाढली आहे. त्यापाठोपाठ बारामतीती ३१५, पुरंदरमध्ये १२५ तर वेल्हेमध्ये १३ विद्यार्थी जास्त झाले आहेत.>>शेवटच्या दिवसापर्यंत ज्या शाळांच्या नोंदी झाल्या नाहीत, त्या कशामुळे बंद आहेत किंवा त्यांनी का नोंदी केल्या नाहीत, याची माहिती घेण्याच्या सूचना तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या जातील. त्यानंतरच वास्तव परिस्थिती समोर येईल.- संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकार, प्राथमिक