शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुण्याच्या पाण्यात कपात किंवा वाढ होणार नाही, पालकमंत्री अजित पवारांचे संकेत

By नितीन चौधरी | Updated: October 20, 2023 17:26 IST

वाढीव कोट्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे....

पुणे : शहराची जुलैअखेरपर्यंतची गरज भागेल एवढे पाणी खडकवासला प्रकल्पात राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागासाठी रब्बीचे एक आवर्तनही देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे पुण्याच्या पाण्यात कपात किंवा वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून उन्हाळी आवर्तनाबाबत जलसंपदा विभाग निर्णय घेणार असल्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे.

बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, रवींद्र धंगेकर, संजय जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, “यंदा जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांची चांगली स्थिती आहे. ग्रामीण भागात पाऊस कमी झाल्याने नीरा डावा, उजवा, खडकवासला चासकमान कालवा, कुकडी आणि घोड कालवा येथून पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे रब्बी आणि उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन कसे असावे यावर चर्चा झाली. पुणे शहरासाठीचे खडकवासला धरणातील पिण्यासाठी आवश्यक पाणी जुलै अखेरपर्यंत शिल्लक ठेवून उर्वरीत पाण्याचे रब्बीच्या पिकांसाठी नियोजन करायचे आहे. केवळ वीर धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन टीएमसी पाणी कमी आहे. त्यामुळे तेथे काटकसर करावे लागेल.” पवना धरण पूर्ण भरले असल्याने पिंपरी चिंचवडला पिण्याच्या पाण्यासाठी काही अडचण येणार नाही. उपलब्ध पाण्याचा शक्य तेथे काटकसर करणे गरजेचे आहे. पुणे महापालिका आयुक्त आणि जलसंपदा विभाग एकत्र बसून पाण्याबाबत काय मार्ग काढता येईल यासाठी सात दिवसांची मुदत पालिका आयुक्तांनी मागितली आहे. पुढील आठवड्यात त्याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

चक्रीवादळामुळे पाऊस पडेल?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात दोन चक्रीवादळे निर्माण झाली असून. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर त्याचा फायदा होऊ शकतो. या पावसामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली तर जानेवारी- फेब्रुवारीत पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

वाढीव कोट्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे-

पुण्याच्या महापालिका आयुक्तांनी पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, “पुणे महापालिकेने राज्य सरकारच्या जलसंपदा खात्याकडे याबाबत मागणी केली आहे. त्याबाबत जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तो प्रस्ताव गेला असेल. त्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.”

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारkhadakwasala-acखडकवासला