शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
5
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
6
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
7
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
8
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
9
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
10
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
11
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
12
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
13
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
14
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
15
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
16
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
17
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
18
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
19
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
20
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ, पण... सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 12:18 PM

Supriya Sule पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? पुणे तुंबण्याला पुणे महापलिका आणि प्रशासन जबाबदार

पुणे : पुणे शहरात शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती. यात पुणेकरांचा दैना झाली. शहरात अवघ्या दोन तासांत झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महापालिकेच्या कारभाराची पाेलखाेल केली. स्मार्ट सिटी पाण्यात बुडाली आणि यातच एका मुलीचा नाहक बळी गेला. हे सर्व घडूनही महापालिका प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत निर्लज्जपणे पावसाकडे बाेट दाखवत आहे. शहरात पावसाळी उपाययोजना कमी पडली; पण ते मान्य न करता कमी वेळात मोठा पाऊस बरसल्याने यंत्रणा कमी पडली असे म्हणत महापालिका प्रशासनाने हात झटकली. हद्द म्हणजे, पुढील दोन तासात सर्व पाणी हटविण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. 

शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि ‘विकास’ पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शनिवारी  शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली होती. याभागात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व पुणे महानगर पालिकेस त्यादृष्टीने उपाय योजना करण्यास सुचवण्यासाठी आज दौरा केला. यावेळी त्यांनी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसासंदर्भांत नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुणे शहरात गुन्हेगारी, ड्रुग्स इशू वाढतायेत. क्राईम रोज वाढत आहे. एका पावसात पुणेकरांची वाईट अवस्था झालीये. पुण्यात बाहेरून लोक राहायला येतात. नवरा बायको दोघे कमावून पुण्यात राहतात. शिक्षणासाठी पुण्याकडे देश अपेक्षेने बघतोय. असं एका पावसात पुण्याची अवस्था  बिकट झाल्याचे पाहून वाईट वाटते. सगळ्या घरांमध्ये पाणी साचतंय. पुणेकर टॅक्स भरतात त्याचे पैसे जातात कुठं? नाल्यांचा प्लॅनिंग, इमारतीला परवानगी PMC देत. मग या पुणे तुंबण्याला पुणे महापलिका (Pune Municipal Corporation) आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यांचे ९८ नगरसेवक त्यांचे निवडून आले. केंद्रापर्यंत त्यांचंच सरकार आहे. आता ते  पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. सत्तेचे नंबर वाढवायला त्यांच्याकडे वेळ आहे. पण या नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशा महाराष्ट्र सरकारकडून आता काय अपेक्षा करणार? सरकारच राजकारण मतांशी जोडलेल असतं. सत्ता हि जनतेच्या सेवेसाठी असते. पुण्याबद्दल सातत्याने नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. मी याबाबत आता आयुक्तांना भेटणार आहे. दिल्लीत तुम्ही कोणते मुद्दे मांडणार असं विचारले असता सुळे म्हणाल्या, राज्यात बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यातून कंपन्या बाहेर चालल्या आहेत. हिंजवडीबाबत आम्ही मिटिंग घेणार आहोत. पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इफ्नोटेक पार्क स्थापन झाली. ६ लाख लोक काम करतात. जगाला दिशा दाखवण्याचं काम आपण केलं. हिंजवडीत पूर्ण देशातून मूल काम करतात. त्यांना असं बाहेर जाऊन देणार नाही.     

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका