शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

माझ्या भाषेवरून टर उडवायचे- मकरंद अनासपुरे : साहित्यिक कलावंत संमेलनात मुलाखत

By श्रीकिशन काळे | Updated: December 24, 2023 20:31 IST

'त्याच भाषेवर आज मी यशस्वी अभिनेता बनलो, ती बोली माझी ताकद बनली.'

पुणे : मला कलेच्या, अभिनयाच्या क्षेत्रात काम करायचे होते. परंतु, घरी काहीही पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे मी जेव्हा मराठवाड्यातून मुंबईला गेलो, तेव्हा खूप बावरलो होतो. काही कळत नव्हते. संघर्ष खूप करावा लागला. माझ्या बोली भाषा वेगळी होती. आमच्या मराठवाड्यातील भाषेचा लहेजा निराळा आहे. तो लगेच ओळखून येतो. त्यामुळे अनेकजण त्यावरून माझी टर उडवायचे, परंतु, त्याच भाषेवर आज मी यशस्वी अभिनेता बनलो, ती बोली माझी ताकद बनली, अशा भावना अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित २३ वे साहित्यिक कलावंत संमेलनात रविवारी अनासपुरे यांची मुलाखत राजेश दामले यांनी घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

अनासपुरे म्हणाले की, मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून मुंबईत आल्यानंतर माझी थोडी भांबावलेली अवस्था होती. अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने संघर्ष खूप होता. परंतु, तो संघर्ष हा मी आनंदाने स्वीकारला. त्या संघर्षाच्या कालावधीत अनेक अपमानास्पद आणि अवहेलनात्मक प्रसंगांना मी सामोरा गेलो. परंतु, याचा खेद न बाळगत बसता मी ध्येयापासून माझे लक्ष विचलीत होऊ दिले नाही.

माझ्या बोलीभाषेवरून आणि माझ्या बोलण्याच्या लहेजावरून माझी टर उडविणारे आज मला फोन करून माझ्याशी त्याच लहेजामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. ते पाहिल्यनंतर समाधान वाटते. नाना पाटेकर यांना मी गुरूस्थानी मानतो. रूपेरी पडद्यावरचे माझे आगमन नाना पाटेकर यांच्यामुळे सुखकर झाले. तसेच वामन केंद्रे यांनी देखील मला खूप मदत केली.

टॅग्स :Makrand Anaspureमकरंद अनासपुरेPuneपुणे