शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

"नानासाहेबांचे विचार आचरणात आणा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:18 IST

‘नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. समाजमनाच्या विचाराबरोबर परिसर स्वच्छता हादेखील त्याचा ध्यास होता.

वारजे : ‘नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. समाजमनाच्या विचाराबरोबर परिसर स्वच्छता हादेखील त्याचा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी दिलेले विचार व संस्कार वैयक्तिक जीवन जगताना आचरणात आणले पाहिजेत. यातून आपण त्यांचे स्मरण सर्वांनी जपले पाहिजे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.वनदेवी मंदिर कर्वेनगर ते शिंदेपूल शिवणे या मुख्य एनडीए रस्त्याला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी पथ असे नामकरण करण्यात आले. या नामकरण फलकाचे उद््घाटन शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाले.या वेळी शरद पवार यांना पद्मविभूषण व तीर्थरूप डॉ. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजीमहाराज यांची साडेतीन फुटांची प्रतिमा व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.गणपती माथा येथील एनडीएच्या मैदानात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासह धर्माधिकारी परिवारातील उमेश, सचिन, राहुल, अर्चना, स्वराली श्रेयस हे आणि शारवीय देशपांडे, सचिन दोडके, कुमार गोसावी, सायली वांजळे, दीपाली धुमाळ, दत्ता धनकवडे, संजय जगताप, सचिन बराटे काका चव्हाण व्यासपीठावर होते. सामान्य माणसांवर योग्य संस्कार, विचार देण्याचे काम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी नानासाहेबांनी आयुष्यभर कष्ट केले. म्हणून त्यांचे नाव या रस्त्याला दिले आहे. बैठकीतील लोकांनी परिसर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केले.>तुमच्याकडून शिस्त शिकण्याची गरज२० ते २५ हजारांचा जनसमुदाय असूनही कार्यक्रमात कुठेही रेटारेटी, गोंधळ झाला नाही. सर्व नागरिक भरउन्हात दुपारी दीडपर्यंत शांत बसले होते. याचे कौतुक करताना खासदार सुळे म्हणाल्या, की सदस्यांच्या शिस्तीची दाद देते. माझ्याकडे तुमच्यासारखी शिस्त नाही. निवडणुकीनंतर आठवडाभर रेवदंडा येथे राहून शिस्त शिकणार. समाजाला अध्यात्मची गरज आहे. धर्माधिकारी परिवार गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत आहे. एवढा मोठ्या संख्येने जनसमुदाय आल्यानतर सकाळी काही काळ येथील रस्ते व चौकात कोंडी होत होती. काही सदस्य तर सकाळी सात वाजताच मैदानात येऊन बसले होते. कार्यक्रमानंतरही स्वयंसेवकांनी केलेल्या योग्य नियोजनानंतर फारशी गडबड न होता नागरिक आपापल्या घरी परतले.>‘‘अशा बैठकांमुळे माणसा-माणसांमध्ये बंधुत्व, प्रेम वाढत आहे. माणसाच्या या शक्तीचा उपयोग समाजातील अन्य घटकांच्या उभारणीसाठी केला जावा. सामूहिक शक्तीच्या माध्यमातून देश बलशाली व बलदंड करण्याची गरज आहे. ही गरज नानासाहेब धर्माधिकारी यांनी मांडली. तो वारसा अप्पासाहेब व सचिन धर्माधिकारी जपत आहेत, असे पवार म्हणाले.अप्पा धर्माधिकारी म्हणाले, ‘‘चांगल्या विचारांची आज गरज आहे. मन स्वच्छ असले तरच सर्व स्वच्छ दिसेल. सध्या अनेक जण चंगळवादाकडे वळत आहे. त्यांच्यापर्यंत संतसाहित्याच्या माध्यमातून मानवता धर्माची शिकवण ही पोहोचविली पाहिजे. संशयामुळे माणूस भरकटतो. सध्या बहुतेक ठिकाणी होत असलेल्या समर्थ बैठकीमुळे हे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार