शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

"ज्यांच्यावर आरोप होताहेत त्यांची सखोल चौकशी व्हावी, त्याला कुणाचाही विरोध होता कामा नये..!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 17:36 IST

सार्वजनिक क्षेत्रात काम करत असेल तर वादातीत राहिले पाहिजे...

पुणे : मागील काही दिवसांपासून पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे. या प्रकरणात वनमंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्यामुळे भाजपने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी देखील केली आहे. आता यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील पूजा चव्हाण प्रकरणी महत्वपूर्ण विधान केले आहे. 

राजू शेट्टी हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणासह विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले. शेट्टी म्हणाले,पूजा चव्हाण प्रकरणावरून ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यात संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. मात्र ज्यांच्यावर आरोप होतो आहे ते कुठल्याही पक्षाचे असले तरी खुलासे झाले पाहिजे. चौकशीला सामोरे गेले पाहिजे. आणि दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, चौकशीला कुणीही विरोध करता कामा नये अशी माझी स्पष्ट भूमिका आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करत असेल तर जीवन वादातीत राहिले पाहिजे. राज्यात महिलांवर अन्याय होत असेल तर ठोस भूमिका घ्यावी. मात्र सध्या जे राजीनाम्याची मागणी करत त्यांची भूमिका विश्वामित्रासारखीच आहे. त्यांच्या काळातही अश्या स्वरूपात आरोप झाले होते. मात्र त्यांची तोंड त्यावेळी गप्प होती. आगामी अधिवेशनात या प्रकरणावर चर्चा होणारच आहे. परंतु गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा करायला हवा असेही शेट्टी यावेळी म्हणाले. 

हल्ली बऱ्याच गोष्टी अचानक घडायला लागल्या आहेत. शेतकरी आंदोलन सुरू असताना अंबानी आणि अदानी यांच्यासाठीच बनवल्याचा समज आहे. ज्यांच्यावर रोख आहेत त्यांना सहानुभूती देण्यासाठी हे घडवले आहे का याबद्दल पोलिसांनी खुलासा करावा. गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या, मुंबई सुरक्षित नाही का असे प्रश्न पडतात.

देशाला अचानक घटना घडण्याची सवय लागली की काय याचे उत्तर सरकारने द्यावे. मात्र यात मला काळबेर वाटते. करून भावना व्यक्त करत असतील मोदींच नाव दिलं, अमित शाहयांचेही देतील. आपल्या मृत्युनंतर समाज आपली दखल घेणार नाही अशी भीती अनेकांना वाटते म्हणून ते आधीच नाव देतात.

साखर एफआरपी हळूहळू शेतकऱ्यांची FRP थकीत होत चालली आहे. थकबाकी वाढत चालली आहे, ती मिळाली पाहिजे. ती मिळाली नाहीतर सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची तयारी सुरू आहे. आम्ही पैसे सोडणार नाही, दर वाढवायचा निर्णय कारखानदार आणि केंद्र सरकार घेईल.

टॅग्स :PuneपुणेSanjay Rathodसंजय राठोडRaju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणPooja Chavanपूजा चव्हाण