शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Pune: ‘नीरा देवघर’प्रकल्पाला साडेतीन हजार कोटी, केंद्र सरकारची अंतिम मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:53 IST

या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारने अंतिम मान्यता दिल्याने या योजनेचा लाभ पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतीला मिळणार आहे....

पुणे : पंतप्रधान किसान सिंचन योजनेत समावेश झाल्याने बहुचर्चित नीरा देवघर धरणाच्या प्रस्तावित १०० किलोमीटर कालव्याच्या कामासाठी सुमारे साडेतीन हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारने अंतिम मान्यता दिल्याने या योजनेचा लाभ पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतीला मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून दहा हजार हेक्टर कृषी सिंचन क्षमता असलेल्या धरण प्रकल्पांना पंतप्रधान किसान सिंचन योजनेत समाविष्ट केल्यानंतर ठराविक निधी देण्यात येतो. यापूर्वी पुणे विभागातील सांगोला शाखा कालवा प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली होती. त्या धर्तीवर नीरा देवघरच्या १५८ किलोमीटर लांबीच्या कालव्यापैकी ९३ किलोमीटरच्या बंदिस्त कालव्याला मान्यता मिळावी, यासाठी पुणे पाटबंधारे विभागाने प्रस्ताव पाठविला होता. या प्रकल्पासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे.

धरणाच्या उजव्या कालव्याचे सुमारे ६५ किलोमीटर लांबीच्या खुल्या भागाचे काम पूर्ण झाल्याने सुमारे ४७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी नीरा देवघर धरणाला भेट देऊन या धरणापासून पंढरपूरपर्यंत प्रकल्पाची पाहणी केली. याबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार, केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस मान्यता दिली. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

यासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. यामुळे माळशिरस, फलटण, सांगोला, पंढरपूर, खंडाळा या दुष्काळग्रस्त भागांना २०२५ मध्ये या योजनेतून पाणी मिळेल. यासाठी केंद्र सरकार ६० टक्के, तर राज्य सरकार ४० टक्के निधी देणार आहे. परिणामी सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच दहा लाख कुटुंबांना पाणी मिळणार आहे. १४ टीएमसी पाण्याची क्षमता असलेला आणि १२.९८ टीएमसी साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प येत्या दोन वर्षात खुला होणार आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

प्रस्तावानुसार केंद्र सरकारने ६० टक्के वाटा उचलण्याचे मान्य केले आहे. त्याची अंतिम मंजुरी सरकारने दिली. त्यामुळे हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल.

- रणजितसिंह निंबाळकर, खासदार 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड