शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 10:34 IST

खडखड होणे हे जिवंत असल्याचे चिन्ह असून तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत

पुणे: राज्याचे नेतृत्व करणारे तिघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील आहेत, त्यांच्यात खडखड ही होणारच. ती नाही झाली तर त्यांना हलवून पाहावे लागेल ते जिवंत आहेत का? खडखड होते याचा अर्थ ते जिवंत आहेत अशा शब्दांमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीमधील नेत्यांच्या नाराजीच्या प्रश्नांचा चेंडू भिरकावून लावला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अनेक नेत्यांनी सोमवारी अभिवादन केले. डॉ. आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद आहेत का, शिंदे यांची नाराजी आहे का, या प्रश्नांना तसे काहीही नाही असे सांगितले व खडखड होणे हे जिवंत असल्याचे चिन्ह आहे असे सांगितले. तिन्ही नेते सरकारमध्ये व्यवस्थित काम करत आहेत असे ते म्हणाले. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनाही पाटील यांनी लक्ष्य केले. शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री प्रथमच रायगडावर गेले. तिथे त्यांचे स्वागत करण्याचे सोडून संजय राऊत गेले तीन दिवस उगीचच काहीही टीका करत आहेत. त्यांना माहिती नाही पण, शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्वत: ५०० पानांचे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन दिल्लीत करायचे की महाराष्ट्रात यावर चर्चा सुरू आहे, ते प्रकाशन लवकरच होईल. राऊत यांनी ते वाचले तर त्यांना चक्कर येईल, असा टोला पाटील यांनी लगावला.

डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची राज्यघटना अचूक आहे. त्यात कोणत्याप्रसंगी काय करायचे याचे सविस्तर मार्गदर्शन आहे. त्यांच्यामुळेच देशाच्या १९५२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्त्री, पुरुष, गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांना मतदान करता आले.

उपेक्षित घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा : मिसाळ

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांचे विचार, त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी काय करता येईल याचे मंत्री झाल्यावर मी गेले चार महिने नियोजन करत आहे. आता पुढील दोन वर्षे त्याप्रमाणे काम करणार आहे. समाजातील उपेक्षित घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा अशी डॉ. आंबेडकर यांची इच्छा होती. त्या प्रमाणे काम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

राज्यघटना जगण्याची ढाल : चाकणकर

चाकणकर म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच माझ्यासारखी एका साध्या कुटुंबातील महिला या पदापर्यंत येऊन पोहोचली. सर्व महिलांनी कुठेही जाताना राज्यघटना बरोबर ठेवायला हवी. ती जगण्याची ढाल आहे. त्यामध्ये त्यांच्यासाठी कायदा आहे, तरतुदी आहेत. प्रत्येक महिलेने राज्यघटना वाचायलाच हवी.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार