शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 20:43 IST

तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़ 

ठळक मुद्दे गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली.

पुणे : डेक्कन भागात भाड्याने घेतलेल्या हॉटेल व्यवसायात पाऊण कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने नाशिकमधील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघा हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे़ भारत बाळासाहेब ढेरिंगे (वय २७, रा. मिडोरी सोसायटी, बावधन) असे या तरुणाचे नाव आहे. हॉटेल व्यावसायिक नरेंद्र तापकीर, उमेश शिंदे आणि वरुणराज शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी बाळासाहेब ढेंरिगे (वय ५०, रा.पळसे, जि. नाशिक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश शिंदे यांचे डेक्कन भागात वरुणराज हॉटेल आहे. उमेश शिंदे आणि त्यांचा मुलगा वरुणराज यांनी हे हॉटेल नरेंद्र तापकीर यांना चालवायला दिले होते. शिंदे यांनी तापकीर यांच्याबरोबर करार केला होता.  नाशिक भागातील शेतकरी बाळासाहेब ढेरिंगे यांचा मुलगा भारत तेथे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. दोन वर्षांपूर्वी तो पुण्यात आला होता. विवाहित असलेल्या भारत यांचा तापकीर यांच्याशी परिचय झाला. त्यानंतर तापकीर यांनी वरुणराज हॉटेल भारत यांना चालवायला दिले होते. हॉटेलचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यापोटी २५ ते ३० लाख रुपये खर्च झाल्याचे तापकीर यांनी त्याला सांगितले होते. भारतने तापकीर यांना ५० लाख रुपये दिले होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी तापकीर यांचा करारनामा संपल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्याकडे पुन्हा हॉटेल चालविण्यास मागितले होते. त्यानंतर तापकीर यांनी भारत याला हॉटेल सोडण्यास सांगितले होते. तेव्हापासून भारत नैराश्यात होता. त्याने तापकीर आणि वरुणराज हॉटेलचे मालक शिंदे यांची भेट घेतली होती. या प्रकरणात काही तोडगा काढा, असे त्याने सांगितले होते. महिनाभरापूर्वी भारतने पुन्हा काही रक्कम त्यांना दिली होती. हॉटेलवरचा ताबा सोडण्यास त्याला सांगण्यात आले होते. गेल्या सोमवारी (५ मार्च) भारत यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी पोलिसांनी भारत यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली. हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले तसेच फसवणूक झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे भारत यांनी चिठ्ठीत नमूद केले होते. पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करत आहेत.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीhotelहॉटेलPolice Stationपोलीस ठाणे