शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एकाच व्यासपीठावरुन तीन अधिकाऱ्यांनी मांडला पुण्याचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 19:45 IST

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विविध मान्यवरांसह वार्तालापाचे अायाेजन करण्यात येते. यावेळी शहर व जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिक बजावणाऱ्या तीन सनदी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले हाेते. त्यांनी शहराच्या व जिल्ह्याच्या एकूण विकासाचा अाढावा घेतला.

ठळक मुद्देशहरात येत्या काळात 32 हजार काेटींची कामे करण्यात येणारहायपूर लूप सेवेबाबत चाचपणी सुरु

पुणे : भारतातील राहण्यास सर्वात उत्तम असलेले शहर, आयटीने दिलेली नवी ओळख, शिक्षणाचा माहेरघर ते स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे शहर,  अश्या विविध ओळख प्राप्त करणाऱ्या पुण्याच्या विकासाचा आराखडा तसेच शहर व जिल्ह्या समोरील आव्हाने तीन अधिकाऱ्यांनी एकाच व्यासपीठावरुन मांडली.     निमित्त होते पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित पुण्याची सद्यस्थिती आणि विकासाची दिशा या विषयावरील वार्तालापाचे. पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरव राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते या तिघा अधिकाऱ्यांनी पुण्यातील विकास कामे, येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच उभी ठाकलेली आव्हाने यांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.     कुणाल कुमार म्हणाले, २०१४ साली मी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पुण्याच्या १५२ विषयांवर काम करण्याची गरज असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावर काम करण्यास सुरुवात केली. शहरातील नागरिकांचा शहराच्या विकासाबद्दलच्या सुचनांमध्ये मोठा सहभाग असतो. एका अहवालानुसार पुणे हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे राहण्यास उत्तम शहर असल्याचे समाेर अाले आहे.  प्रत्येक पुणेकर घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला शहर आपलं स्वागत करीत असल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. यादृष्टिने काम करण्यात येत आहे. शहराला जास्तीत जास्त डिजिटायज करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात शहरात 32 हजार काेटींची कामे करण्यात येणार अाहेत.      सौरव राव म्हणाले, पुणे जिल्ह्याची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. जिल्ह्याची वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराची योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. येत्या काळातही 190 गावांचा या उपक्रमात सहभाग करुन घेण्यात येणार अाहे.  प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा थर्ड पार्टीकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन देण्याचं काम करण्यात येत आहे. पुरंदरमध्ये प्रस्तावित असलेल्या विमानतळासाठी ज्यांच्या जागा घेण्यात येत आहेत, त्यांना त्रास होणार नाही, व त्यांना योग्य मोबादला कसा मिळेल याकडे लक्ष देण्यात येत आहे.     गित्ते म्हणाले, पुणे महानगरचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पीएमआरडीएला आर्थिक स्वावलंबी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो ही पीपीटी तत्त्वावर करण्यात येणार आहे. हायपर लूप बाबतही प्राथमिक चाचणी करण्यात येत असून, पुणे - मुंबई दरम्यान हायपर लूप सेवा सुरु करणे शक्य आहे का, याबाबतची पाहणी सध्या करण्यात येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेkunal kumarकुणाल कुमारKiran Gitteकिरण गित्तेSaurabh Raoसौरभ राव