शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

जनावरांना विकण्याची वेळ

By admin | Published: June 02, 2016 12:36 AM

जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना अखेर बाजार दाखविण्याची वेळ आली आहे. उपाशी जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे

काऱ्हाटी : जिवापाड सांभाळ केलेल्या जनावरांना अखेर बाजार दाखविण्याची वेळ आली आहे. उपाशी जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरे जगविण्यासाठी आता तरी चारा डेपो सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सध्या, अजूनही दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतच आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई भासत असल्याने शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत दिसत आहे. परिसरात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांबरोबरच जनावरांनाही मोठ्या प्रमाणात दुष्काळाची झळ बसली आहे. विहिरी, बोअरवेल पाणीसाठा अल्प प्रमाणात असल्याने दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती भागात भीषण दुष्काळाने शेतकऱ्याचे सगळीक डून आर्थिक नियोजन पूर्ण ढासळले आहे. पिण्यास पाणी नाही. शेती ओस पडली आहे, तर जनावरांना चारा नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. साठवलेला चारा संपला आहे. चारा विकत घेऊन पाच महिने जनावरांना जगवले. मात्र, आता पैसा जवळ नाही. त्यामुळे शेतकरी जिवापाड सांभाळलेली जनावरे मातीमोल बाजारभावाने बाजारात विकत आहेत. दरम्यान, एक लाख रुपये किमतीची गाय आज पस्तीस हजार रुपयांनी विकण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली असल्याचे फोंडवाडा (लोणी)चे संजय पिसाळ व लालासोा भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)स्वच्छतागृह वापराविना पडूनपिंपळी : गुणवडी येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्वच्छतागृह वापराविना पडून आहेत. ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे; परंतु या ठिकाणी पाण्याची सोय नाही.शिवाय मैलापाणी जाण्यासाठी तशी उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे अनेक स्वच्छतागृह वापराविना पडून आहेत. अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे मोडून पडलेले आहेत. अनेक ठिकाणी दरवाजे नाहीत. या गावामध्ये अनेक कुटुंबांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागा नाही. आर्थिक अडचणींमुळे स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे. (वार्ताहर)