शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

काही सेकंदाची घाई कशासाठी भावा? वेळ नव्हे, जीव महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 3:24 PM

सहा महिन्यांत ३७ हजार वाहनांनी तोडले सिग्नल....

पुणे : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांची संख्या पुण्यात दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करतात; पण शेवटी काही सेकंदांच्या घाईमुळे आपला जीव जाऊ शकतो हे भान वाहनधारकांना राहत नाही. यामुळे किरकोळ अपघातांसह गंभीर अपघात देखील होण्याचा धोका अधिक असतो. तसेच सिग्नल यंत्रणा ही वाहतुकीचे नियोजन चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी उभारलेली असते. मात्र पुणेकर मात्र सिग्नलही जुमानत नसल्याचे पोलिसांनी कारवाई केलेल्या वाहनांच्या आकडेवारीवरून सिद्ध होते. त्यामुळे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.

सहा महिन्यांत ३७ हजार वाहनांनी तोडले सिग्नल

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ११ ऑगस्ट या कालावधीत ३७ हजार ७ वाहनधारकांनी सिग्नल तोडला आहे. यात काहींनी तर एकापेक्षा अधिक वेळा सिग्नल तोडला असल्याचे त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईवरून सिद्ध होत आहे.

दंड किती ?

पहिल्यांदा सिग्नल तोडल्यावर वाहतूक पोलिसांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. यानंतर मात्र पुुन्हा जेवढ्या वेळी वाहन चालक सिग्नल तोडणार त्याला प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड ठोठावण्यात येतो.

सात महिन्यात भरला १ कोटी ९४ लाख रुपयांचा दंड

सिग्नल तोडलेल्या ३७ हजार ७ वाहनधारकांनी ११ ऑगस्टपर्यंत १ कोटी ९२ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा दंड भरला आहे. सिग्नल तोडणाऱ्यांपैकी ६३२ जणांनी १५०० रुपयांप्रमाणे दंड भरला असल्याचे देखील यावरून सिद्ध होते.

अपघाताची शक्यता वाढते

पुणेकरांमध्ये सिग्नल तोडण्याची जणू स्पर्धाच लागली असल्याचे दिसून येते. काही मिनिटे सिग्नलवर थांबण्यास वाहनचालक तयार नसतात. पण यामुळे ज्या रोडवरील सिग्नल सुटला आहे ती वाहने भरधाव जात असताना आपण सिग्नल तोडला तर गंभीर अपघात होऊ शकतो. जीव जाऊ शकतो याचे भान वाहनचालकांना नसते. मुळात जर आपण नियमांचे पालन केले तर दंडही भरावा लागणार नाही आणि अपघातही होणार नाही.

नागरिकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे असते. आम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करतो; पण वाहनचालकांच्या घाईमुळे गंभीर अपघात झाला तर ते जीवावर बेतू शकते, यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

- राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस