शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

पोखरी घाटात वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात

By admin | Published: July 07, 2015 3:18 AM

भीमाशंकरचे दर्शन घेऊन परतत असताना हिंगोली जिल्ह्यातील ७० वारकऱ्यांनी भरलेल्या ट्रकला अपघात होऊन यामध्ये ४१ जण जखमी झाले

घोडेगाव : भीमाशंकरचे दर्शन घेऊन परतत असताना हिंगोली जिल्ह्यातील ७० वारकऱ्यांनी भरलेल्या ट्रकला अपघात होऊन यामध्ये ४१ जण जखमी झाले. गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून पोखरी घाटातील अवघड वळणावर गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. आळंदीतून माऊलींची पालखी निघण्यापूर्वी विदर्भ, मराठवाडा येथून आलेले अनेक वारकरी भीमाशंकरच्या दर्शनासाठी येत असतात. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील महागाव, पिंपराळा, खांडेगाव, टेंभुर्णी, वडताळा येथील हे ७० वारकरी नाशिक त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन भीमाशंकरकडे आले होते. आज दि. ६ रोजी पहाटे दर्शन घेऊन आळंदीकडे जात असताना मंचर- भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाटातील कळमजाई मंदिराजवळ अवघड वळणावर सकाळी ९.१५ च्या सुमारास अपघात झाला. अपघात झाल्याचे दिसताच सोमनाथ गेंगजे व मापोली ग्रामस्थांनी तत्काळ मदत करण्यास सुरुवात कली. डिंभे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव पोलीस ठाण्यासही कळविले. तात्काळ पोलीस व घोडेगाव, मंचर येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात येऊन सर्व जखमींची विचारपूस केली. तसेच वसमतचे आमदार जयप्रकाश दांडेगावकर व जयप्रकाश मुंदडा यांना दूरध्वनी करून अपघाताची माहिती दिली .त्यांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे़ आमदार नीलम गोऱ्हे यांनी दुपारी अपघातग्रस्तांची भेट घेतली. (वार्ताहर)