शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

वाहतूककोंडी होणार कमी

By admin | Published: December 30, 2016 4:43 AM

हिंजवडी ते शिवाजीनगर या नव्या मेट्रो मार्गामुळे हिंजवडीतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच पिंपरी, चिंचवड, वाकड, ताथवडे आणि थेरगावमधील

पिंपरी : हिंजवडी ते शिवाजीनगर या नव्या मेट्रो मार्गामुळे हिंजवडीतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच पिंपरी, चिंचवड, वाकड, ताथवडे आणि थेरगावमधील नागरिकांना हिंजवडीमार्गे शिवाजीनगरला जाण्यासाठी एक जलद सेवेचा मार्ग उपलब्ध होऊ शकेल. हिंजवडी आयटी क्षेत्रातील कामगारांबरोबर परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाची दळणवळण सुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाज या दोन मेट्रो मार्गानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.५ किलोमीटर मेट्रो मार्गास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील विविध कंपन्यांमध्ये सुमारे दोन लाख कामगार काम करतात. औद्योगिकीकरणास मिळेल आणखी चालना पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि हिंजवडी ते शिवाजीनगर हे दोन मेट्रो मार्ग औद्योगिकीकरणास चालना देण्यास उपयुक्त ठरणार आहेत. रस्त्यांचे जाळे हे शहराच्या विकासाच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. ज्या ठिकाणची दळणवळण यंत्रणा सक्षम, त्या ठिकाणी विकासाला अधिक चालना मिळत असते. पिंपरी-चिंचवड सध्या पुण्यापासून थोडे दूर वाटत असले, तरी मेट्रोसारख्या जलद वाहतूक प्रकल्पामुळे हे अंतर कमी होऊ शकेल. पुणे व पिंपरी-चिंचवडच्या एकत्रित विकासाचा सेतू म्हणून मेट्रो उपयुक्त ठरणार आहे. या परिसरात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांची वर्दळ असते. हिंजवडी ते वाकड पूल या मार्गावर नेहमीच आयटी कंपन्या सुटतेवेळी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. आयटी कंपन्यांची अभियंत्यांना ने- आण करण्याची व्यवस्था सक्षम नाही. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांशी कर्मचारी स्वत:च्या वाहनाने ये-जा करतात. त्यामध्ये चारचाकी वाहने वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. त्यातच आयटी कंपन्यांची वाहन सुविधा अपुरी पडत असल्याने हिंजवडी आयटी पार्क परिसरात स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तम दर्जाची वाहतूक सुविधा असल्यास स्वत:चे वाहन वापरण्याचे प्रमाण कमी होईल. पिंपरी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग पुणे-मुंबई महामार्गाने जाणार आहे. हा मार्ग निगडीपर्यंत नेण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. विनाअडथळा, जलद वाहतूक सेवा बीआरटीनंतर आणखी जलद वाहतूक सेवा देणारा मेट्रो मार्ग पिंपरी ते कृषी महाविद्यालय, शिवाजीनगरपर्यंत होणार आहे. रस्त्यापेक्षा किती तरी पट उंच पुलावरून मेट्रोचे ट्रॅक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे बीआरटी आणि नेहमीच्या वाहतूक व्यवस्थेतील पुलांचा कसलाही अडथळा मेट्रोला येणार नाही. बीआरटी बसने अवघ्या २० मिनिटांत निगडी ते दापोडी अंतर कापणे शक्य होणार आहे.