शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

"गद्दारी आमच्याबरोबर केली पण हीच शेतकऱ्यांबरोबर करू नका" - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 12:54 IST

पुण्यात माजी मंत्री व युवासेना नेते आदित्य ठाकरे अतिवृष्टी पाहणी दौरा

पुणे : राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या राज्यातील शेतकऱ्यांना भेटी देत आहेत. अतिवृष्टी पाहणी दौरा अंतर्गत शेतकरी संवाद आणि शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. त्यानिमित्त पुण्यातील शिरूर तालुक्यातील मलठण गावाला आदित्य ठाकरेंनी भेट दिली. यावेळी गावातील शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे गाव शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतं. 'अस्मानी संकटाशी लढणाऱ्या बळीराजाच्या साथीला, बांधावरच्या भेटीला!' या ब्रीदवाक्य सह या दौऱ्यात ठाकरे यांच्या शेतकऱ्यांशी भेटी सुरू आहेत. अंबादास दानवे आणि सचिन अहिर यांचीही दौऱ्याला ठाकरे यांच्यासोबत उपस्थिती होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी खाली बसून संवाद साधला. 

 आदित्य ठाकरे म्हणाले,  इथे अतिवृष्टी झाल्यानंतर तुमच्या शेताचे पंचनामे झालेत की नाही? शेतकऱ्यांना हा पहिला प्रश्न करत संवादाला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी एकही पंचनामा झाला नसल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी हीच परिस्थिती आम्हाला या घटनाबाह्य सरकारकडे घेऊन जायची असल्याचे सांगितले. तसेच गद्दारी आमच्यासोबत केली पण हीच गद्दारी या माझ्या शेतकऱ्यांबरोबर करू नका असेही त्यांनी सरकारला सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस