शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

स्मारकासाठी प्रयत्न करणार

By admin | Published: March 27, 2017 2:39 AM

ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी

लोणावळा : ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य झाले व त्यांनी भेटी दिल्या, त्या ठिकाणांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बाबासाहेबांना अभिप्रेत संकल्पना प्रत्यक्षात आणू, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. आॅल इंडिया भिक्खू संघ यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म महाअधिवेशनात बडोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले, आमदार बाळा भेगडे, भदंत महाबोधी डॉ. राहुल बोधी महाथेरो, भदंत पघ्यादीपजी, भदंत विरत्न थेरो, भदंत विनय बोधी थेरो, रिपाइंचे प्रदेश महामंत्री अविनाश महातेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, सुनील शेळके, नगरसेवक दिलीप दामोदरे, अनिता पवार, पंचायत समिती सभापती गुलाब म्हाळसकर, रिपाइंचे नेते गणेश गायकवाड, संजय आडसुळे, लक्ष्मण भालेराव, चंद्रकांता सोनकांबळे, शांताराम कदम आदी उपस्थित होते.शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा भिक्खू संघाने जगभरात प्रचार व प्रसार करावा,असे मत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. आमदार भेगडे म्हणाले, ‘‘मावळ तालुक्यातील देहूरोड येथील दीक्षाभूमी व तळेगाव येथील डॉ. आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या विकासासाठी कालच राज्य शासनाने दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे, आॅल इंडिया भिक्खू संघाचे मुख्यालय असलेल्या गया येथे २५ कोटी रुपयांचे अद्ययावत बुद्धविहार उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. महाअधिवेशनाचे आयोजक भदंत डॉ. राहुल बोधी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. २२ देशांतील धर्मगुरू व प्रतिनिधी सहभागी झाले होते. (वार्ताहर)रामदास आठवले : संविधानामुळे जाती-धर्म एकत्रआठवले म्हणाले, ‘‘मला बौद्ध धर्माचा अभिमान आहे. मात्र, मी सर्व जाती-धर्माचा आदर करतो. कोणी कोणता धर्म स्वीकारायचा, कोणाचे पालन करायचे यांचे प्रत्येकांना स्वातंत्र्य आहे. भारत हा हिंदू देश असला, तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या देशात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत. सम्राट अशोक हे क्षत्रिय होते. मात्र, त्यांनी शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली व प्रचार केला. डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर जगभरात मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रसार झाला.