शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

समाविष्ट गावात पाण्याच्या टाक्यांसाठी वीस जागा ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:54 IST

यासाठी महापालिकेने या गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

 

पुणे :पुणे महापालिकेतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्यात आली असून, सध्या ३२ गावे महापालिकेत समाविष्ट आहेत. या गावांमध्ये स्थानिक जलस्रोत आणि टँकरशिवाय पाणीपुरवठ्यासाठी अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नाहीत.

या गावांमध्ये बेसुमार बांधकामे वाढत आहेत, लोकसंख्या वाढत आहे; पण पाणी नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहेत. यासाठी महापालिकेने या गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात ॲमेनिटी स्पेसच्या जागा ताब्यात आलेल्या २० जागांवर पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत. या टाक्यांमध्ये सुमारे तीन कोटी ५० लाख लिटर दैनंदिन पाणीसाठा करता येणार आहे.

पुणे महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे आणि २०२१ मध्ये २३ गावे समाविष्ट झाली. त्यातील त्यापैकी लोहगाव वाघोली, सूस म्हाळुंगे, बावधन येथील पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहेत. समाविष्ट गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी जागांची आवश्यकता होती, त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने जागेची मागणी केली होती. महापालिकेत सुविधा क्षेत्र समितीची बैठक झाली. त्यामध्ये २० जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेकडून आराखडे तयार

आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव बुद्रुक, सूस, म्हाळुंगे, बावधन, जांभूळवाडी, लोहगाव, वाघोली या गावांत जागा मिळाल्या आहेत. समाविष्ट गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने आराखडे तयार करून घेतले आहेत. त्यातील काही योजनांचे काम सुरू झाले आहे. ज्या भागात पाणीपुरवठा होतो, त्याच्या एक तृतीयांश पाणीसाठा होईल इतक्या पाणी क्षमतेची पाण्याची टाकी बांधणे आवश्यक आहे.

ॲमेनिटी स्पेसच्या बैठकीत २० जागा पाण्याच्या टाकीसाठी मिळाल्या आहेत. यातून दैनंदिन पाणीसाठा ३ कोटी ५० लाख लिटर इतका करता येणार आहे. या ठिकाणी टाक्यांचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल. -नंदकिशोर जगताप, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण