शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 09:25 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली...

पुणे : भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या पुण्यात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेशरद पवार यांना लक्ष्य करण्यात आले. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची १० वाक्यांचे जाहीर वाचन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली.

बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवारी झालेल्या या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे तसेच पक्षाचे केंद्र तसेच प्रदेश पातळीवर अनेक नेते उपस्थित होते.

फडणवीस यांनी वेगवेगळ्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘वज्रमूठबद्दल काय बोलणार? वज्रमूठचा निर्माता असलेले शरद पवार त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात वज्रमूठचा चेहरा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणतात पाहा, असे सांगून फडणवीस यांनी त्या पुस्तकातील १० वाक्येच वाचून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, ‘पवार म्हणाले, तेच आम्ही म्हणत होतो, तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवले.’

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, ‘त्या निकालानंतर तरी त्यांना जाग येईल, असे वाटले होते. तसे झालेले नाही. उद्धव ठाकरे यांनी ८ मागण्या केल्या होत्या. त्या मागण्याही फडणवीस यांनी वाचून दाखवल्या, प्रत्येक मागणीनंतर ते न्यायालयाने हे मान्य केले का? असा प्रश्न विचारून प्रेक्षागृहातील भाजप कार्यकर्त्यांकडून ‘नाही’ सामूहिकपणे म्हणून घेत होते. ‘असे असूनही ते म्हणतात गावोगाव निकाल सांगू. सांगा, बडवा! आमच्या बापाचे काय जाते! सरकार पूर्ण घटनात्मक आहे. न्यायालयानेच तसे स्पष्ट केले आहे. हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करेलच, शिवाय पुन्हा निवडून येईल,’ असा दावा फडणवीस यांनी केला व त्यावरही कार्यकर्त्यांकडून टाळ्या घेतल्या.

फडणवीस यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केले. ‘मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे,’ असे म्हणून देवेंद्र फडणवीसांनी टीआरपी कसा खेचावा यासाठी शरद पवारांचा क्लास लावावा, असे फडणवीस म्हणाले.

महाविकास आघाडीची संभावना त्यांनी विश्वासघाताचे सरकार अशी केली. ‘खंडणीखोरांपासून दाऊदशी संबंध असलेला मंत्रिमंडळात होता. मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षांत केवळ काही तास आपण मंत्रालयात बघितलं. मोठ्या मोठ्या लोकांची गळचेपी होताना आपण बघितले. पोलिसांच्या बदल्यांमध्ये होणारं कांडही आपण पाहिलं. एक पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा व तिसरा भाकरी फिरवणारा,’ अशी त्यांनी भाकरी फिरवावी लागते यावर कोटी केली.

पवारांच्या पुस्तकातील फडणवीसांनी सांगितलेले १० मुद्दे

- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंबाबत नव्हती.

- उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती.

- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला नव्हती

- कुठे काय घडतंय, याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष नसे.

- उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची, याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं, ते नव्हतं.

- त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.

- महाविकास आघाडीचं सरकार कोसळत असताना त्यांनी संघर्ष न करता पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.

- उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते. परंतु, ऑनलाइन पद्धतीने.

- दुसरीकडे राजेश टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री प्रत्यक्ष प्रशासनाच्या संपर्कात होते.

- उद्धव ठाकरेंचं फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडले नव्हते.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे