शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:33 IST

शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे

पुणे : उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला. आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात या हल्ल्याचे त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. शरद पवारांच्या घरावर हल्ला होणे हि अतिशय निंदनीय बाबा असल्याचे राजकीय नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच केंदीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या घटनेबाबत उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे ते म्हणाले आहेत. पुण्यात बालगंधर्व येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनतर्फे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

 आठवले म्हणाले, शरद पवारांच्या घरावरचा हल्ला ही अतिशय निंदनीय बाब आहे. राज्य सरकारकडून एसटी कामगारांच्या आंदोलनाला चिघळवणाचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलनाला असं वळण देणं योग्य राहणार नाही. पवारांच्या घरावरच्या हल्ल्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याची टीका आठवले यांनी केली आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना सेवा पुरवल्या आहेत. राज्य सरकारने आतातरी विलीनीकरणचा निर्णय घ्यावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. पगार मिळाला नाही. विलीनीकरण झाले तर खूप मोठी अडचण येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे 

मशिदवर भोंगे लावू नका ही भुमिका योग्य नाही 

राज ठाकरेंच्या भोंगे या प्रकरणाबाबत बोलताना आठवले म्हणाले, मी मनसेच्या भूमिकेशी सहमत नाही. त्यांनी भोंगे लावले म्हणून आम्ही भोंगे लावू हे योग्य नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेत मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायला बंदी नाही. पण मशिदवर भोंगे लावू नये ही भुमिका योग्य नाही. राज ठाकरे मोठे नेते आहेत. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे पण ते त्यांचे वारसदार नाहीत. उद्धव ठाकरे हे वारसदार आहेत. बाळासाहेब असते ते त्यांनी उद्धव ठाकरे यांना आघाडीसोबाबत जाऊ दिले नसते. उद्धव ठाकरेंनी त्यांचा विचार बदलावा. ते निर्णय बदलत नाहीत याचं वाईट वाटतं त्यांनी निर्णय बदलावा आणि आमच्या बरोबर सत्तेत यावं यासाठीही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसे