शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

उद्धव ठाकरेंना कोणत्याही न्यायालयात न्याय मिळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 2:09 PM

केंद्र सरकारने यासाठी ४ हजार कोटींचा निधी राखून ठेवला असून त्यातील साडेसातशे कोटी महाराष्ट्राच्या वाट्याला येणार

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलासा देताना मेरिटवर निकाल दिला असे मत आठवले यांनी या वेळी व्यक्त केले. उद्धव ठाकरे आता कोणत्याही न्यायालयात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही. एवढेच नाही तर त्यांना जनतेच्या न्यायालयातही न्याय मिळणार नाही, असा दावा आठवले यांनी यावेळी केला. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने पुण्यात आयोजित विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

अनुसुचित जाती व जमातींच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी पूर्वी केंद्र सरकारचा वाटा केवळ १० टक्के होता. तर राज्य सरकार ९० टक्के भार उचलत होते. आता हा वाटा ६० व ४० टक्के करण्यात आला आहे. त्यानुसार यंदा केंद्र सरकारने यासाठी ४ हजार कोटींचा निधी राखून ठेवला असून त्यातील साडेसातशे कोटी रुपये महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले, केंद्र सरकार या घटकासाठी न्यायाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे एससी विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत १ लाख ५९ हजार कोटी तर एसटी साठी १ लाख ३३ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी येत्या पाच वर्षांसाठी केंद्र सरकारने ४ हजार कोटींचा निधी राखीव ठेवला आहे. एक जिल्हा एक वृद्धाश्रम या योजनेतून ५०० वृद्धाश्रम सुरू करण्याची योजना आहे. तसेच नशामुक्त जिल्हा या योजनेतून सध्या ३७२ जिल्ह्यांमध्ये नशामुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. व्हेंचर कॅपिटल योजनेतून एससी तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी १५ कोटींचे कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार