शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

Rahul Gandhi | "त्वरीत अपात्रतेचा निर्णय घटनेला धरून मात्र त्यात राजकारण अधिक"

By राजू इनामदार | Updated: March 24, 2023 19:12 IST

त्यात राजकारण अधिक आहे असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले...

पुणे : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना सूरत न्यायालयात २ वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय त्वरीत घेतला तो राज्यघटनेला धरूनच आहे, मात्र त्यात राजकारण अधिक आहे असे मत घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

देशभरात राहूल यांचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केल्याची चर्चा आहे. सूरत न्यायालयाने त्यांना एका गुन्ह्यात २ वर्षांची शिक्षा दिल्यानंतर सचिवालयाने त्वरीत हा निर्णय घेतल्यासंदर्भात“लोकमत’ बरोबर बोलताना बापट यांनी सांगितले की सचिवालयाचा हा निर्णय राज्यघटनेला धरूनच आहे. आता राहूल गांधी न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळाली तरच त्यांचे संसद सदस्यत्व राहू शकते. मात्र हा निर्णय घटनेला धरून असला तरी त्यात कायदेशीर बाबींपेक्षाही राजकीय दबाव जास्त आहे.

तो कसा? असा प्रश्न केल्यावर डॉ. बापट म्हणाले, “राजकारणाविषयी मला काहीही बोलायचे नाही. मात्र राज्यघटनेतील काही तरतुदी सांगता येतील. घटनेच्या १०२ व्या कलमात अपात्रतेविषयीची तरतुद आहे. त्यात दिवाळखोर, मानसिक दृष्ट्या कमजोर, अन्नधान्य भेसळ, अंमलीपदार्थ वाहतूक अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्यात २ वर्षांची शिक्षा झाली असेल तर अपात्र होईल. त्यातच पुढे त्याने अपील केले असेल तर त्याचा निकाल लागेपर्यंत अपात्र करता येणार नाही अशी तरतुद होती. ती घटनाबाह्य असल्याचा विचार पुढे आल्याने ती काढून टाकण्यात आली.”

मात्र पुढच्याच म्हणजे १०३ व्या कलमात संसद सदस्याच्या अपात्रतेचा निर्णय राष्ट्रपती घेतील व त्याआधी ते मुख्य निवडणूक आयुक्तांसमवेत चर्चा करतील असे आहे. राहूल गांधी प्रकरणात हे झालेले दिसत नाही. बदनामीच्या प्रकरणात (कलम ४९९) जास्तीजास्त शिक्षा २ वर्षांची असेल असे नमुद आहे. जास्तीतजास्त शिक्षा ही प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन सुनावली जाते. या प्रकरणात २ वर्षांची शिक्षा सुनावली गेली, कारण ती २ वर्षांची असेल तरच अपात्र करता येते असे स्पष्ट दिसत असल्याचे डॉ. बापट यांनी सांगितले.

राजकारण किंवा राजकीय व्यक्तींविषयी काहीच बोलायचे नाही, पण या प्रकरणात दबाव असल्याचे प्रकरणाच्या अभ्यासावरून ठळकपणे दिसते आहे. भारतीय जनता न पटणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या गोष्टींबाबत जाहीरपणे किंवा सामुहिकपणे काहीच बोलत नाही, मात्र ती सुज्ञ आहे असे विश्वास डॉ. बापट यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा