शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

अनधिकृत बांधकामांचे पेव

By admin | Published: November 16, 2015 1:55 AM

ग्रामपंचायती जाऊन नगर परिषदा आल्या तरी राजगुरुनगर आणि चाकण परिसरात अनधिकृत बांधकामे रोखण्यास प्रशासनाला यश आलेले नाही

राजगुरुनगर : ग्रामपंचायती जाऊन नगर परिषदा आल्या तरी राजगुरुनगर आणि चाकण परिसरात अनधिकृत बांधकामे रोखण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे सुरूच असून, या दोन्ही शहरांच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने ही अनधिकृत बांधकामे मोठा अडथळा ठरणार आहेत. राजगुरुनगर नगर परिषदेने अशा सुमारे ४० बांधकामाना नोटिसा बजावल्या असूनही बांधकाम करणारे नोटिसांना न जुमानता बांधकामे करीतच आहेत. पिंपरी-चिंचवडनंतर वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये चाकण आणि राजगुरुनगरचा समावेश होतो. विशेषत: चाकण हे औद्योगिक वसाहतीमुळे वेगाने विकसित होत आहे. मात्र गेल्या वर्षीपर्यंत येथे ग्रामपंचायती असल्यामुळे अनधिकृत बांधकामे वेगाने सुरूहोती. त्यामुळे या गावाचे अंतर्गत रस्ते अतिशय अरुंद राहिले आहेत. बहुमजली इमारती झाल्या, पण वाहनतळ नसल्याने वाहने उभी करण्याचा प्रश्न आहे. परिणामी रस्त्यवर वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यात पथारीवाल्यांची आणि वडापावसारख्या गाड्या लावण्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते. अनधिकृत बांधकामांमुळे कचरा, सांडपाणी यांचेही मोठे प्रश्न या गावांमध्ये उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी गटारे नाहीत. असलेली एवढ्या बांधकामांना पुरी पडत नाहीत. त्यामुळे रस्त्यांवरून पाणी वाहात असते. पावसाळ्यात तर रस्तेच गटारे होऊन जातात. कचरा उचलणे स्थानिक व्यवस्थापनाला शक्य होत नाही. या अस्ताव्यस्त बांधकामांमुळे वीज, पाणीपुरवठा या व्यवस्थांवर ताण येतो. आगीसारखी घटना घडली तर बंब घुसविताना आणि तो उभा करताना सुद्धा मुश्कील होते.राजगुरुनगरमध्ये गेल्या महिन्यात एक छोटी आग लागली तेव्हा हा अनुभव नागरिकांना आला होता. या समस्या असतांनाही अनधिकृत बांधकामे थांबत नाहीत. त्यांना कोणीही अटकाव करू शकत नाही याची खात्री पटली आहे. गावातले रस्ते अरुंद झाल्याने चाकणला फार पूर्वीच पुणे- नाशिक महामागार्ला बाह्यवळण काढावे लागले. आता राजगुरुनगरलाही याच कारणाने बाह्यवळण होत आहे. (वार्ताहर)