शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

पाणी सोडण्यावर अनिश्चितता

By admin | Published: September 24, 2015 3:13 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी मुळा-मुठा नदीत पाणी सोडावे

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही. यामुळे गणरायाच्या विसर्जनासाठी मुळा-मुठा नदीत पाणी सोडावे किंवा नाही, याबाबत तत्काळ सुस्पष्ट अहवाल देण्याच्या सचूना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे महापालिकेला दिल्या आहेत.राव यांनी सांगितले, ‘‘यंदा पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिली. धरणांच्या साठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. पाण्याची गंभीर टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व धरणांमधील पाणीसाठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांत जिल्ह्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे साठा वाढला आहे. आगामी पावसाळी हंगामापर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यातील कोणत्याही धरणांमधून प्रामुख्याने खडकवासला प्रकल्पातून मुळा-मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय पावसावर अवलंबून राहणार आहे. याबाबत विसर्जनासाठी मुळा-मुठेत पाणी सोडण्याबाबत दबाव वाढत आहे. यामुळे पाणी सोडण्यासंदर्भात महापालिकेकडून अहवाल मागविला आहे.’’