शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांमुळे पुण्यातील सुविधांचा बट्याबोळ - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:09 IST

चूकीच्या पद्धतीने चालू असलेली विकास कामं आणि बिल्डर मित्रांच्या भल्यासाठी सुरु असलेला पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे पहिल्या पावसानंतरच पुणेकरांचं जीवन त्रासदायक

पुणे : पुणे शहरामध्ये शनिवारपासून (दि. ८) पावसाला सुरुवात झाली, पण या मुसळधार पावसामुळे पुणे शहर आणि परिसराची अक्षरशः दैना उडाली. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदी अवतरली होती. शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, एरंडवणा, कोथरूड, कर्वेनगर, हडपसर, लोहगाव, धानोरी, सिंहगड रोड परिसर, वारजेसह शहराच्या विविध भागांत नागरिकांची तारांबळ उडवली.  सायंकाळी ४ वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. शहरातील ही अवस्था पाहून पुणे महापालिकेने केलेल्या नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहराचा मागील काही वर्षांत झपाट्याने झालेला विस्तार, यात जागा बळकावण्याच्या हव्यासापोटी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर केलेले अतिक्रमण, त्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, सिमेंट रस्त्याचे वाढलेले जाळे अन् तुंबलेली गटारे यासह विविध कारणांमुळे पुण्याची तुंबई झाली. स्मार्ट सिटीचे वाभाडे निघाले आणि ‘विकास’ पाण्यात वाहून गेला, अशा शब्दांत पुणेकर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरामध्ये अर्धा तास जोरदार पाऊस झाला की, ठिकठिकाणी ड्रेनेजलाइन तुंबली जाते. पूरस्थिती निर्माण होते. परिणामी, सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसतो. साधारणपणे २०१९ पासून शहरात तुंबई होत असल्याचा अनुभव येत आहे. आंबिल ओढ्याला पूर आला तेव्हापासून नागरिकांना या पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. खरंतर पुण्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण देखील वाढलेले आहे. कमी वेळेत शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पडत आहे. परिणामी, सिमेंटच्या रस्त्यांवर लगेच पाण्याचा डोह साठतो. या पाण्याला जाण्यासाठी योग्य रस्ताच देण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणचे ड्रेनेज बुजलेले आहेत, नाले बुजलेले आहेत. त्यामुळे पाणी थेट रस्त्यांवर येते. सखल भागात हे पाणी जाऊन साचते. म्हणूनच पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

आदित्य ठाकरेंनी या पावसानंतर ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.  घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजपाच्या बिल्डर-कॉंट्रॅक्टर मित्रांनी मुंबईप्रमाणेच पुण्यातील पायाभूत सुविधांचा बट्याबोळ केलेला आहे अशी टीका त्यांनी केलीये. 'रिव्हर फ्रंट डिस्ट्रक्शन' असो, वेताळ टेकडीची लावलेली वाट असो, की नालेसफाईतला घोळ असो., पहिल्या पावसातच जर पाणी तुंबायला लागलं असेल आणि जनजीवन विस्कळीत होत असेल तर ते पुण्यासाठी धोकादायक आहे. चूकीच्या पद्धतीने चालू असलेली विकास कामं आणि बिल्डर मित्रांच्या भल्यासाठी सुरु असलेला पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे पहिल्या पावसानंतरच पुणेकरांचं जीवन त्रासदायक झालेलं आहे असं ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेRainपाऊसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा