शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

...तोपर्यंत कोणीच संविधानाला धक्का लावू शकणार नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 17:26 IST

Ajit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता.

बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बालेकिल्ल्यातून शक्तीप्रदर्शनाची सुरुवात केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बारामतीमध्ये जन सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी भर पावसात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, विरोधकांकडून होणाऱ्या टिकेलाही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

लोकसभा निवडणुकीत संविधान बदलतील असा खोटा प्रचार आमच्याविरोधात (महायुती) करण्यात आला. मात्र, चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावणार नाही. मी जो शब्द देतो, तो पूर्ण करतो. कुणी गैरसमज निर्माण केले तर आमचा महायुतीवर विश्वास आहे असं सांगा. शाहु-फुल-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ असा शब्द मी देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.

आम्ही खोटं बोलणार नाही, सत्ता येते सत्ता जाते. सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाहीत. सत्तेचा ताम्रपाठ घेऊन कोणी आलेलं नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी झाला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. तसेच, एमएसपी संदर्भात बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, मी काल अमित शाह यांची भेट घेतली व साखरेच्या संदर्भात त्यांच्याशी बोलणी केली. एमएसपी वाढवायला पाहिजे असं त्यांना सांगितलं. त्या संदर्भातील निवेदन त्यांना उद्या देणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आम्ही कुठेही कांदा आयात केला नाही. दुधाची पावडर आयात केली नाही. दुधाचे दर वाढत नाही, तोपर्यंत प्रतिलिटरला सरकारने ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील लोकांना ही भाजीपाला दूध वाजवी दरात मिळाला पाहिजे. पण शेतकऱ्यालाही त्याची चांगली किंमत मोबदला मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, जगाची आर्थिक राजधानी मुंबई करायची आहे. चुकीच्या प्रचारावर, जो काही नॅरेटीव्ह सांगायचा प्रयत्न करतील त्यावर विश्वास ठेऊ नका. वरुणराजा सुद्धा आपल्यासोबत आहे, असे अजित पवार म्हटले. 

याचबरोबर,  जनसन्मान मेळाव्यातून प्रत्येक जिल्हा, तालुका ढवळून काढायचा आहे, असे सांगत  आजची सभा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मात्र, यापुढे महायुतीच्या संयुक्त सभा होतील. विधानसभा निवडणुकीपर्यंत या सभा सुरु राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाला प्राधान्य दिले, विकासाला डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत राहील. हाच झंजावात आपल्याला चालू ठेवायचा आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेस