शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

पुन्हा पुन्हा तळणासाठी एकच तेल वापरणे घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:11 AM

पुणे : तळणासाठी वापरलेले एकच तेल अनेकदा वापरले, तर त्याचे घातक परिणाम खाद्यपदार्थ खाणाऱ्यांवर होतात. त्यामुळे एकदा वापरलेले तेल ...

पुणे : तळणासाठी वापरलेले एकच तेल अनेकदा वापरले, तर त्याचे घातक परिणाम खाद्यपदार्थ खाणाऱ्यांवर होतात. त्यामुळे एकदा वापरलेले तेल पुन्हा -पुन्हा वापरू नये. जर अशा सतत वापरलेल्या तेलातील खाद्यपदार्थ खाल्ले तर हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. तसेच इतरही आजार होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि अशा प्रकारे कोणी सतत तेल वापरत असेल, तर त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे करावी.

एकच तेल पुन्हा वापरल्यास त्यात हायड्रोकार्बन तयार होतात. ते लठ्ठपणा आणि मधुमेहाला निमंत्रण देऊ शकते. तसेच किडनीलाही धोकादायक ठरते. त्यामुळे तळलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरणं टाळले पाहिजे. तेलाच्या वापराबाबत फूड्स सेफ्टी अँड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI)नं मार्गदर्शक तत्त्वं जारी केलीत. वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणं चांगलं नसल्याचं FSSAIनं म्हटलंय.

आहारतज्ज्ञ डॉ. तेजस लिमये म्हणाल्या, ‘बऱ्याचदा तळण्यासाठी लोखंडी कढई वापरली जाते. त्यातील लोहाची तेलाबरोबर रिॲक्शन होऊन इतर काही घातक घटक तेलात उतरतात. ट्रान्स फॅट्स व या इतर घटकांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता देखील वाढते. तसेच तेल पुन्हा पुन्हा तापवून वापरले तर ते घट्ट होते आणि असे तेल खाद्यपदार्थ जास्त शोषून घेतात. यामुळे जास्त तेल पोटात जाते. या सगळ्यांचा विचार करता शक्यतो एकच तेल पुन्हा पुन्हा वापरू नये.’

—————————————

घरामध्ये तळणाला वापरलेले तेल पुन्हा वापरायचे असेल, तर ते गाळून पोळीला लावण्यासाठी किंवा फोडणीसाठी वापरता येईल. तसेच असे तेल जास्त गरम करू नये. तळणासाठी लोखंडी कढईपेक्षा अल्युमिनियमची कढई वापरावी.

- डॉ. तेजस लिमये, आहारतज्ज्ञ

———————

पुन्हा पुन्हा वापरलेल्या तेलाने आजारांना निमंत्रण

रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनविणाऱ्या गाड्यांवर अनेकदा एकच तेल सतत वापरले जाते. त्यामुळे तेलाचे जे स्ट्रक्चर असते, ते बदलते. आपण खूप जास्त तापमानाला (तेलातून वाफा येईपर्यंत) तेल गरम केले तर त्यातील सूक्ष्म घटकही बदलतात आणि त्यात ट्रान्स प्रकारचे फॅट्स तयार होतात. हे ट्रान्स फॅट्स आपल्या हृदयासाठी खूप घातक असतात. त्यांच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साठून राहण्यास सुरुवात होते, असे आहारतज्ज्ञ डॉ. तेजस लिमये यांनी सांगितले.

—————————————

तथ्य आढळल्यास संबंधितांवर खटला

एकच तेल सतत वापरत असतील तर त्याबाबत आमच्याकडे कोणी तक्रार केली, तर आमची टीम तिथे जाऊन तपासणी करते. त्या तेलाचे सॅम्पल घेऊन लॅबला पाठवते. लॅबकडून रिपोर्ट आल्यानंतर संबंधितांवर खटला दाखल केला जातो. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना योग्य ती शिक्षा केली जाते.

शिवाजी देसाई, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

—————————————