शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
जवळ आले, तोंड दाबलं अन् नंतर...; मुंबईत CSMT रेल्वे स्थानकाजवळ महिलेवर बलात्कार
3
T20 WC 2024 : रोहित शर्मानं जे केलं तेच आम्हीही करू; हरमनप्रीत कौरनं सांगितलं टीम इंडियाचं ध्येय
4
'ये लडकियां ना-महरम...'! पाकिस्तानात व्यासपीठावरून का निघून गेला झाकीर नाईक? मागे धावताना दिसले अधिकारी
5
'सिकंदर' सलमान खानचं 'किक' फोटोशूट! भाईजानने हटके पद्धतीने केली 'Kick 2'ची घोषणा
6
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
7
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
8
'बाप-लेकी'च्या भेटीवर हसीन जहाँची तिखट प्रतिक्रिया; शमीवर आरोप करत म्हणाली...
9
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
10
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
11
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
12
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
13
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
14
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
15
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
16
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
17
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
18
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
19
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
20
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत

जलशिवार योजना पुरंदरला वरदान

By admin | Published: September 22, 2015 3:21 AM

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे

नारायणपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुरंदर तालुक्यात करण्यात आलेले बहुतांश बंधारे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्याने ही योजना पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरली असल्याचे चित्र आहे. या अभियानांतर्गत तालुक्यात ३०९ कामे मंजूर झालेली असून त्यापैकी तब्बल १९० कामे पूर्ण झाली आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज या कामांची तालुक्यातील गावोगावी जाऊन पाहणी केली. अनेक बंधारे तुडुंब भरून वाहत असल्याचे पाहून शिवतारे यांनी समाधान व्यक्त केले. पुरंदर तालुक्यातील दिवे, सोनोरी, पानवडी, सटलवाडी, एखतपूर-मुंजवडी, साकुर्डे, काळदरी, देवडी, हिवरे, मांढर, टेकवडी, परिंचे, गुळुंचे, नावळी, वाळूंज, नवलेवाडी, पिंगोरी, वाल्हा, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर आदी गावांचा या योजनेत समावेश आहे. या गावांमध्ये नवीन सिमेंट बंधारे, गाळ काढणे, खोलीकरण करणे, बंधारा दुरुस्ती करणे, बांध-बंदिस्ती अशी अनेकविध स्वरूपाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवतारे म्हणाले, की दुष्काळमुक्तीसाठी १९६२नंतर अनेक आयोग नेमले गेले; पण त्यांच्या शिफारसी बासनात गुंडाळण्यात आल्या. या सगळ्या बाबींचा अभ्यास करून अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना, मी ही योजना शासनाला सुचवली होती. प्रायोगिक तत्त्वावर पुरंदर तालुक्यात ही योजना राबवावी आणि यश पाहून नंतर राज्यात हा पॅटर्न राबवावा, असेही मी सुचवले होते. शासनाने त्या वेळी उदासीनता दाखवली; मात्र राज्यात युतीचे सरकार आल्यावर ही योजना प्रामुख्याने हातात घेण्यात आली. राज्यभर त्याचे यश दिसत असून, अनेक गावे जलयुक्त होत आहेत. भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यासाठी याची मोठी मदत झाली आहे. सत्ता गेल्यामुळे कामधंदा न उरलेले अनेक उतावीळ विरोधक माझ्यावर टीका करत होते. त्यांना माझी कामगिरी हेच उत्तर असेल असेही शिवतारे म्हणाले.