शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘वैकुंठ’ व्हायरल व्हिडिओ : कुत्रा मांस नव्हे पाव खात असल्याचा महापालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:28 IST

वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी काही नागरिक आपल्या एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीत गेले होते. यावेळी  

पुणे : नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा तुकडा खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी मात्र व्हिडीओतील कुत्र्याच्या तोंडात आणि परिसरात पडलेले मांसाचे तुकडे नसून मोठे पाव आहेत, असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. येथील भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे. दरम्यान, याप्रकरणी दत्तवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून, संबधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

 

पुणे महापालिका क्षेत्रात १० विद्युत दाहिन्या, १३ गॅस दाहिन्या, १ हायब्रीड दाहिनी, तसेच २३ ए.पी.सी. यंत्रणा, अशा एकूण ४७ यंत्रणा शवदहनासाठी उपलब्ध आहेत. त्यामधील नवीपेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी काही नागरिक आपल्या एका नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी वैकुंठ स्मशानभूमीत गेले होते. यावेळी परिसरात काही भटकी कुत्री जळालेल्या मृतदेहाच्या जवळ काही तरी खात होती. हा प्रकार पाहून घाबरलेल्या नागरिकांनी बारवकर यांना ही माहिती दिली, तसेच या कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर बारवकर यांनी या प्रकरणाची आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर हे मृतदेहाचे तुकडे नसून पाव असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले.

वैकुंठ स्मशानभूमीवर सर्वाधिक ताण

'वैकुंठ स्मशानभूमीत शवदहनासाठी तीन विद्युत दाहिन्या, एक गॅस दाहिनी आणि लाकडावर अंत्यसंस्कारासाठी सहा वूड पायर पद्धतीच्या चार शेड कार्यान्वित आहेत. या दाहिन्या आणि चार शेडमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आठ स्वतंत्र स्क्रबर आणि ब्लोअर यंत्रणा बसविण्यात आली आहे. या धुरावर प्रक्रिया करून तो ३० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या चिमणीमधून हवेमध्ये सोडण्यात येतो. शहरात १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत २८ स्मशानभूमी उभारण्यात आल्या आहेत. या स्मशानभूमी उभारणीमागचा उद्देशच शहरातील विविध भागांतील नागरिकांना त्या-त्या भागांत अंत्यसंस्कार करण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, हा होता. मात्र, शहरातील एकूण मृतदेहांपैकी ५७ टक्के मृतदेहांवर एकट्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे लोकांचे प्राधान्य वैकुंठ स्मशानभूमीलाच असते. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवर सर्वाधिक ताण येत आहे.

 

आमच्याकडे केवळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि विद्युत दाहिनी चालू-बंद करणे एवढीच जबाबदारी आहे. इतर सर्व व्यवस्थापन क्षेत्रीय कार्यालय आणि आरोग्य विभागाची आहे. त्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले आहे.  - मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महापालिका

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाDeathमृत्यूcivic issueनागरी समस्या