शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पराभवाला वळसे पाटील हेच जबाबदार : आढळराव पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:36 IST

‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला.

ठळक मुद्देआंबेगाववर भगवा फडकविण्यासाठी सज्ज रहाकार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावेसहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार

मंचर  : ‘‘अभिनेत्याच्या प्रतिमेचा व मालिकेचा प्रभाव; तसेच जातीचे राजकारण यामुळे लोकसभेला पराभव झाला. या पराभवाला डॉ. कोल्हे जबाबदार नसून वळसे पाटील हेच प्रामुख्याने जबाबदार आहेत. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसारखे दिग्गज नेते निवडणुकीत पराभूत होतात. मग वळसे पाटील का पराभूत होणार नाही, आंबेगाव विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा,’’ असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच लांडेवाडी येथे येऊन आढळराव पाटील यांनी जनता दरबारात कार्यकर्ते व नागरिकांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी झालेल्या मेळाव्यात ते म्हणाले,देशात मोदी लाट असताना शिरूरमधील पराभवाचे अनेकांना वाईट वाटले, तर काहींना आत्ताच पश्चाताप होतोय. १५ वर्षे जे बरोबर राहिले ज्यांनी साथ दिली, त्यांचे आभार मानत एका पराभवाने घरी बसणे शहाणपणाचे नव्हते. त्यामुळे मतदार संघात राष्ट्रवादीची गुंडगिरी व दहशत वाढली असती. म्हणून पुन्हा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आलो आहे. एका व्यक्तीच्या प्रतिमेचा, मालिकेचा प्रभाव व जातीच्या समीकरणामुळे निवडणुकीत पराभव झाला. मालिका पाहणाऱ्या महिलांनी राजाला मतदान करायचे, असे म्हणत समोरच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे वैयक्तिक कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. यापूर्वीही मी थांबलो नाही व आताही थांबणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पाठवून सरकार तुमच्या पाठीशी असून कामांना प्राधान्य राहील, असे आश्वासन दिले आहे. आमदार सुरेश गोरे म्हणाले, की आढळराव पाटील यांचा या निवडणुकीत नैतिक विजय झाला आहे. मतदारांनी विकासापेक्षा प्रतिमेला महत्त्व दिले. कार्यकर्त्यांनी पराभव विसरून पुन्हा कामाला लागावे, दादा पुन्हा खासदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  ...........निवडणुकीत बैलगाडा, विमानतळ, वाहतूककोंडी हे प्रश्न बाजूला पडून केवळ जातीय समीकरणे व मालिका हा फॅक्टर चालला. यात माळी समाजाला दोष देऊन उपयोग नाही. ही पाच वर्षे अशी निघून जातील.४ महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रित करावे. सहाही मतदार संघांत अगदी भाजप उमेदवारांचाही मी ठासून प्रचार करणार आहे.       - शिवाजीराव आढळराव पाटील........४जनता दरबार सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाºयांबाबत तक्रार केली. निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले नसल्याने पराभव झाला, असे कार्यकर्ते सांगत होते. हा मुद्दा आढळराव पाटील यांनी खोडून काढला. मागील ३ निवडणुकांमध्ये जसे कार्यकर्ते काम करत होते, तसेच त्यांनी यावेळी केले आहे. ४त्यांना दोष देऊन उपयोग नाही. समोर अभिनेता उमेदवार असल्याने पराभव झाला आहे. इतरांवर दोष देण्यापेक्षा यापुढील काळात येणाºया विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना आढळराव पाटील यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल