शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

हजारो लिटर पाणी वाया

By admin | Published: May 29, 2015 12:57 AM

खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.

विश्वास खोड ल्ल पुणेपुण्यात पाणी बचतीसाठी पाणीकपातीचे धोरण राबविले जात आहे. असे असतानाही मात्र, खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या मुठा कालव्यातून हिंगण्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही गळती सुरू आहे. मात्र ही गळती दुरुस्त करण्याऐवजी पाटबंधारे खात्याने महापालिकेलाच जबाबदार धरले आहे. महापालिकेकडून जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते. कालव्याच्या मुखापासून पर्वती पायथ्यापर्यंत पाणी येईपर्यंत काही ठिकाणी शेतासाठी, टँकर भरण्यासाठी, वॉशिंग सेंटरसाठी चोरून पाणी वापरले जाते. सध्या सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. मात्र हिंगण्याच्या डोंगराळ भागात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. या गळतीमधून किती पाणी वाया जाऊन नदीत मिळते याचे मापन आजवर झालेले नाही. डोंगराळ भागातून जाणाऱ्या मुठा कालव्याच्या हिंगण्यातील भागात कालवा दुरुस्त करणे अवघड असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने यापूर्वी केला आहे. या बाबत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेलाच जबाबदार धरले आहे. सिंचनासाठी आवर्तन सुरू नसताना कालव्यातील पाण्याची पातळी कमी असतानाही पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रास प्रतिसेकंद तीनशे क्युसेक्सने पाणी द्यावेच लागते. त्यामुळे पूर्णपणे पाणी सोडणे थांंबविता येणार नाही, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे.दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून होणाऱ्या पालिका आणि खडकवासला पाटबंधारे विभागातील वादाची चर्चा यंदा फारशी झाली नाही. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा एक अब्ज घनफूट (टी.एम.सी.) पाणीसाठा अधिक असल्याचा पाटबंधारे विभागाचा दावा असून, पुण्यावर पाणी कपातीची वेळ येणार नाही, असे आश्वासन दिले जात आहे.1पावसाविषयी खात्री नसताना शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे पालिकेचे अधिकारी चिंताग्रस्त आहेत. प्रत्यक्षात कालव्यातून गळती होणाऱ्या पाण्याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागच नव्हे तर तत्कालीन पालक मंत्रीही गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. दर आवर्तनाच्या वेळी या मुठा कालव्यातून पाणी वाया जात आहे. सध्याही सिंचनासाठी पाणी सोडले जात असताना हिंगणे भागात या कालव्यातून धो-धो पाण्याची गळती होत आहे.2महानगरपालिका पंधरा टी.एम.सी. पाण्यासाठी दरवर्षी २७ कोटी रुपये खडकवासला पाटबंधारे विभागास देते. जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणी मोजून घेतले जाते असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागच जबाबदार असून, त्याबाबत काहीही हालचाली होत नसल्याने शेतीसाठी आणि पिण्यासाठी असलेल्या पाण्याची नासाडी अशाच प्रकारे होत राहणार असल्याचे स्पष्ट आहे.