शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

बंधाऱ्यांतून पाणी वाहून जातेय

By admin | Published: May 12, 2017 4:50 AM

तालुक्यातील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या दगडी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : तालुक्यातील नीरा नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या दगडी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांना साधारणपणे २० ते २५ वर्षे झाल्याने दगड, सिमेंट निघाले असून, मोठमोठी भगदाडे पडल्याने गळती लागल्याने पाणी वाहून जात आहे. कोणत्याच बंधाऱ्यात पाणीसाठा होत नाही; त्यामुळे शेतीच्या पाणी उपसायोजना, नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास भविष्यात शेतीबरोबरच नळपाणी पुरवठा योजना अडचणीत येतील. मात्र, पाटबंधारे विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी नीरा नदीवर निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, शिंद, वेनवडी, येवली, वडगावडाळ या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना उपयोग व्हावा म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक बंधाऱ्यांचे सिमेंट, दगड निघाले आहेत. मोठमोठी भगदाडे पडली आहेत. मोऱ्या वाहून गेल्या असून अनेक ठिकाणचा स्लॅप पडला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरून अलीकडे-पलीकडे जाता येत नाही. बंधाऱ्याच्या पायातून पाणी खाली वाहून जात आहे. अनेक वर्षे बंधाऱ्यांना गळती लागली आहे. त्यामुळे या दगडी बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नाही.लाखो रुपये खर्च करून नीरा नदीवर ८ बंधारे बांधण्यात आले होते. मात्र, निकृष्ट कामामुळे काही बंधारे वगळता इतर बांधाऱ्यांत पाणीसाठा होत नाही. शेतीला व पाण्याच्या विहिरींना या पाण्याचा उपयोग होत नाही. अशीच स्थिती कायम राहिल्यास भविष्यात नीरा नदीवरील बंधाऱ्यांच्या पाण्यावर आवलंबून असलेल्या साळव रायरी, कंकवाडी, निगुडघर, आपटी, नांदगाव, आंबेघर, वाठार हि.मा., पोम्बर्डी, शिंद, वेनवडी या गावांच्या नळपाणी पुरवठा योजना धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.