शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

अखेर महिन्यानंतर सोडले कालव्यातून पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 2:45 AM

कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले.

पुणे : कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याआभावी जळून चाललेल्या दौंड, इंदापूर, बारामती भागातील शेतकरी सुखावणार आहेत. धरणातून ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने पाणी वाढविले जाणार आहे.दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याची घटना घडल्यामुळे खरीप हंगामासाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी बंद करावे लागले होते. तसेच कालव्यातील लाखो लिटर पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात घुसल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. तर महिनाभर कालव्यातील पाणी बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्याने पेरलेली पिके जळून गेली. त्यामुळे कालवा दुरूस्तीची कामे तत्काळ करून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात होती. अखेर रविवारी कालव्यातून सोडण्यात आले.जलसंपदा विभागाच्या कर्मचाºयांनी कालवा परिसरातील नागरिकांना कालव्यातून पाणी सोडल्याची कल्पना दिली. तसेच कोणीही कालव्यात उतरू नये, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे जसे पाणी पुढे जाईल, तसे जलसंपदा विभागाचे कर्मचारीही पाण्याबरोबर जात होते. दुरूस्ती केलेल्या ठिकाणी थांबून कालव्या बाहेर जाते का? याची पाहणी करत होते.लष्करसाठी पाणी उचलणारकालवा बंद असल्यामुळे लष्कर भागातील नागरिकांना पिण्यासाठी पालिकेला पाणी उचलता येत नव्हते. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.परंतु, कालव्यात पाणी सोडल्यामुळे पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात कालव्यातून २५० एमएलडी पाणी उचलले जाईल. सायंकाळी ६ वाजता ३०२ क्यूसेक्सने पाणी सोडले असून रात्री दहा वाजता ५00 क्यूसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली. - मनीषा शेकटकर,लष्कर व होळकर जलशुद्धीकरण केंद्रधरणसाठ्यात अडीच टीएमसी पाणी कमीपावसाने पाठ फिरवल्याने खडकवासला धरण प्रकल्पात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा कमी आहे.त्यातच रविवारपासून कालव्यातून इंदापूरला शेतीसाठी विसर्ग सोडण्यात आल्यामुळे धरण साठ्यात आणखी घट होणार आहे.रविवारी खडकवासला धरणसाठ्यात २४.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता.पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या खडकवासला,पानशेत,टेमघर,वरसगाव या धरणसाखळीत सध्या ८४.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी ९२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.टेमघर धरणाच्या दुरूस्तीसाठी धरण रिकामे केले जात आहे.त्यामुळे धरणात ०.५७ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असून वरसगाव धरणात १२.७४,पानशेतमध्ये १०.४,तर खडकवासला धरणात १.२९ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.गेल्या वर्षी २८ आॅक्टोबर रोजी धरणात २७.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.तर यंदा २८ आॅक्टोबर रोजी २४.६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकPuneपुणे