शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Published: February 27, 2015 6:00 AM

अवेळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे विविध रोगाशी सामना करीत कसेबसे कांदापिक वाचवले. मात्र, आता निकृष्ठ बियानांमुळे बहुतांश

ओझर : अवेळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे विविध रोगाशी सामना करीत कसेबसे कांदापिक वाचवले. मात्र, आता निकृष्ठ बियानांमुळे बहुतांश ठिकाणी कांदा पिकाला डेंगळे आली आहेत. त्यामुळे नगदी कांदा पिकाचा हंगाम वाया गेला आहे. भांडवली खर्चासाठी कर्ज काढून कांद्याचे पीक घेतले; परंतु डेंगळांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ६२९४ हेक्टरवर कांद्याची लागवड असून येथील शेतकरी धास्तावला आहे. शेतकऱ्यांची पुढची युवा पिढी शेती व्यवसायात पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिकीकरणाची कास धरून मोठ्या उमेदीने शेती व्यवसायात उतरली आहे. कांदे बियाणे टाकण्याच्या काळात बियाणांचा प्रचंड तुटवडा निर्माण यामुळे कांदाउत्पादकांनी इतर शेतकऱ्यांकडून तसेच दुकानांमधून चढ्या दराने कांदा बी घेतले. मात्र याची गुणवत्ता तपासली नाही. त्यामुळे हे निकृष्ट बी टाकल्यामुळे त्यांना आता डेंगळाचा समाना करावा लागत आहे. नगदी पीक म्हणून कांदापिकावर शेतकऱ्याचे बारमाही प्रापंचिक अर्थकारण अवलंबून असते. डेंगळ्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते या वर्षी कोलमडणार आहेत. डेंगळा समस्यामुळे निकृष्ट बियाणांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, निकृष्ट बियाणांचा पुरवठा करणाऱ्या खासगी शेतकरी तसेच कंपन्यांवर शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून पुढे येत आहे. डेंगळे आलेल्या तालुक्यातील सर्व कांद्याच्या प्लॉटची पाहणी करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांनी सांगितले.(वार्ताहर)