शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

पुण्यावर पाणीकपातीचे पुन्हा सावट?

By admin | Published: March 28, 2015 11:45 PM

नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे.

पुणे : नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणार २७ मार्च अखेर १२.२५ टीएमसी पाणीसाठा शिल्ल्क असून मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठी १३़२० टीएमसी होता. मात्र, त्यानंतरही जून महिन्यापासून पुणेकरांच्या पाण्यात १२ टक्के कपात करून एकवेळ पाणी देण्यास सुरूवात केली होती. मात्र, या वर्षी मागील वर्षीपेक्षा एक टीएमसी कमी पाणी असल्याने ही कपात एक महिना आधीच लागू करण्याची भिती व्यक्त केली जात आहे. धरणांमधील पाण्याने मागील वर्षी जून २०१४ महिन्यात तळ गाठला होता. त्यातच राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूनने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे २ टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे २८ जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात १२ टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता. मात्र, जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच नसल्याने महापालिकेने ही पाणीकपात ३५ टक्क्यांवर नेत शहरात ११ जुलै पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. या वेळी या धरणांमध्ये अवघा १.१० टीएमसी पाणीसाठा होता. मात्र १२ जुलै नंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरातील पाणी कपात मागे घेण्यात आली. त्यानंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता.