शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

कळमोडीचे पाणी पुन्हा अडवले

By admin | Published: November 24, 2015 12:48 AM

कळमोडी धरणातून पोलीस बंदोबस्तामध्ये रविवारी सोडण्यात आलेले पाणी स्थानिक शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी पुन्हा बंद केले.

चासकमान : कळमोडी धरणातून पोलीस बंदोबस्तामध्ये रविवारी सोडण्यात आलेले पाणी स्थानिक शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी पुन्हा बंद केले. शेतकरी व कृती समितीला विश्वासात न घेताच पाटबंधारे विभागाने पोलीसबळाचा वापर करून कळमोडी धरणातले पाणी १९५ क्युसेक्स वेगाने आरळा नदीपात्रात सोडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. पहिले पाणी सोडले त्या वेळेस शेतकऱ्यांनी पाणी बंद केले होते. चासकमान शाखा अभियंता पडवळ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पाणी सोडण्यात येईल, असे त्या वेळी सांगितले होते. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या उद्रेकाच्या भीतीपोटी पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणात रविवारी पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेचे आश्वासन देऊनही, रविवारी कळमोडी धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी कृती समितीने सोमवारी सकाळी धरणावर जात पाण्याच्या विसर्ग थांबवला. यापुढे संबंधित अधिकारी यांनी शेतकरी कृती समितीबरोबर चर्चा केल्याशिवाय धरणातून पाण्याचा एक थेंब खाली जाऊन देणार नाही, असा ठाम निर्णय घेतला. पाणी बंद करण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गोपाळे, लक्ष्मणराव मुके, पांडुरंग गोपाळे, धारू कृष्णा गवारी, संतोष गोपाळे, काशीनाथ गोपाळे, सुदाम पवार, संतोष कदम, गणपत गोपाळे यांसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)