शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 10:39 IST

यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं

पुणे: खांद्यावर पताका, हातात चिपळ्या, टाळ, वीणा, डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी, टाळ-मृदंगाच्या तालावर नर्तन करीत ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा जयघोष करणारे वैष्णव, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने अवघी पुण्यनगरी दुमदुमली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात उत्साहात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी आजिनाथ किसन अभंग (वय ६०) यांनी भावना व्यक्त करत पाण्याची लय टंचाई असून पुढं कसं  होणार असा सवाल उपस्थित केला आहे.  

अभंग म्हणाले, यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय. यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. पहाटे २ वाजता उठून बसलो व्हतो. ३ वाजता पाणी येणार म्हणून. लय अडचण होतीय बाबा. कसं होणार पुढं काय माहीत?’ पावसाने यंदा ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. 

वारीतदेखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याविषयी वारकऱ्यांची गप्पा मारल्या. तेव्हा यंदा जरा अवघडच परिस्थिती निर्माण होईल, अशाच प्रतिक्रिया सर्वांनी दिल्या. गेल्या तेरा वर्षांपासून आजिनाथ अभंग वारी करत आहेत. ते इंदापूर तालुक्यातील झगडेवाडीतील. ते वारीत गंध लावण्याचे काम करतात. त्यांना ५ एकर शेती आहे. त्यांच्याकडे १३ जर्सी गायी आहेत. त्यावरच त्यांचे घर चालते. ते म्हणाले, ‘मी माझ्या मंडळीसोबत (पत्नी) वारीला यायचो; पण आता मंडळींचे पाय खूप दुखत आहेत. त्यामुळे तिला यायला जमत नाही.’

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022FarmerशेतकरीRainपाऊस