शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई; २४ गावांतील सुमारे ४० हजार नागरिकांची तहान टॅंकरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:40 IST

यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर

पुणे: जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या असून, आंबेगाव, भोर, जुन्नर आणि खेड या चार तालुक्यांतील २४ गावांमधील १०५ वाड्या-वस्त्यांना २० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टॅंकरमुळे या २४ गावांतील सुमारे ४० हजार नागरिकांची तहान भागविली जात आहे.

मागील वर्षी मान्सूनचे वेळेवर झालेले आगमन, दमदार पाऊस यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली. तसेच परतीचा पाऊसही समाधानकारक झाला. त्यामुळे काहीशा उशिराने यंदा जिल्ह्यात टॅंकर सुरू करावे लागले. आता मात्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यातच यंदा पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. मे महिनाअखेर आणि जूनच्या पहिला आठवड्यात टॅंकरच्या संख्येमध्ये आणि पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

आंबेगाव तालुक्यातील ८ गावांमधील ३५ वाड्या-वस्त्यांना ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भोरमधील एका गावात एक टॅंकर सुरू आहे. जुन्नरमधील ८ गावांमधील ३२ वाड्या-वस्त्यांना ६ टॅंकरने, तर खेडमधील ७ गावांमधील ३८ वाड्या-वस्त्यांना पाच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाने १९ विहिरी अधिग्रहित केल्या असून, त्याद्वारेसुद्धा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या २४ गावांमधील ३९ हजार ६०७ नागरिकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWaterपाणीDamधरणwater shortageपाणीकपात