शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

स्वत:ची पिके नष्ट करून गावाला पाणी!

By admin | Published: May 29, 2016 3:58 AM

शिरोली (ता. खेड) येथे स्वत:च्या अडीच एकर शेतातील उभी पिके नष्ट करून शेतातील विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे दातृत्व दाखविण्याचे काम शिरोली

कडूस : शिरोली (ता. खेड) येथे स्वत:च्या अडीच एकर शेतातील उभी पिके नष्ट करून शेतातील विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे दातृत्व दाखविण्याचे काम शिरोली येथील गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे करीत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून शिरोली गावास अव्याहतपणे स्वत:च्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी देण्याचे काम करीत आहेत.सध्या सर्वत्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. खेड तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरूनगर शहरापासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर भीमा नदीकाठावर असलेल्या शिरोली गावात सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. भीमा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे झाले आहे. त्याचा परिणाम परिसरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शिरोलीत दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.शिरोली गावातील बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी, वैदवस्ती या वाड्यावस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे गावच्या पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. परंतु, भीमा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे या वाड्या-वस्त्यांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन शिरोली येथील शेतकरी गोविंद मनाजी राक्षे व संजय रामचंद्र राक्षे यांनी आपल्या अडीच एकर शेतजमिनीत असलेली दुधी भोपळा, बाजरी व मका ही पिके स्वत: उपटून नष्ट केली असून, जमीन नांगरून टाकली आहे व शेतासाठी देण्याचे विहिरीचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी मोटारने उपलब्ध करून दिले आहे. बेंढालेवस्ती, वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या वाड्या-वस्त्यांवरील जवळपास एक हजार लोकवस्तीला या विहिरीवरून दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे.शिरोली येथील वडारवस्ती, भेसळवाडी व वैदवस्ती या बहुतांश मागासवर्गींय नागरिकांच्या वस्त्या आहे. येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन शेतकरी गोविंद राक्षे व संजय राक्षे यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून जवळपास दीड ते दोन कि.मी. अंतरावरून स्वखर्चाने पाइपलाइन करून घराजवळ पाण्याची टाकी बांधून मोटारीने विहिरीतील पाणी या पाण्याच्या टाकीत टाकून नळकोंडाळी काढली आहेत. या नळकोंडाळ्यावर गेल्या तीस वर्षांपासून बाराही महिने या वस्त्यांवरील नागरिक पिण्यासाठी पाणी नेत आहेत.गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी देण्यासाठी स्वत:च्या शेतातील पिके नष्ट करून मानवता धर्म पाळत नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या गोविंद राक्षे व संजय राक्षे या शेतकऱ्यांचे संपूर्ण शिरोली गावात कौतुक होत आहे. (वार्ताहर)देवाच्या कृपेने उन्हाळ्यातही आमच्या शेतातील विहिरीस मोठ्या प्रमाणावर पाणी असते. शेतातील पिकांसाठी पाणी देण्याऐवजी लोकांना पिण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. म्हणून शेतातील पीक नष्ट करून प्रथम लोकांसाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे.- गोविंद राक्षे, शेतकरीशेतातील पिकांना पाणी देण्यापेक्षा मानवता धर्म महत्त्वाचा आहे. त्यामुळे पिकांपेक्षा नागरिकांना पाणी देणे महत्त्वाचे आहे. गेल्या तीस वर्षांपासून येथील नागरिकांना या विहिरीचे पाणी देत असून, त्यामुळे नागरिकांच्या आशीर्वादामुळे व देवाच्या कृपेने विहिरीस भरपूर पाणी उपलब्ध आहे.- संजय राक्षे, शेतकरी