शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

उजनीमुळे पाणीबाणी

By admin | Published: November 17, 2015 3:19 AM

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याकडे भीमा नदी व बोगद्यातून पाणी सोडण्याचे सत्र सुरूच राहिल्याने इंदापूरकरांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. सर्वपक्षीयांच्या वतीने

इंदापूर : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याकडे भीमा नदी व बोगद्यातून पाणी सोडण्याचे सत्र सुरूच राहिल्याने इंदापूरकरांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. सर्वपक्षीयांच्या वतीने बुधवारी (दि. १८) उजनी धरणाचे दरवाजे बंद करण्याची व हिंगणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.उजनी धरण शेतकरी बचाव कृती समितीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आदी राजकीय, सामाजिक, पक्ष संघटनांचे कार्यकर्ते एकत्र झाले. सायंकाळी शासकीय विश्रामगृहात उजनीच्या पाण्यासंदर्भात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात पाणीहक्कासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्याचेही ठरले.बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे दशरथ माने, विजयराव शिंदे, प्रवीणभैया माने, काँग्रेसचे मंगेश पाटील, मुकुंद शहा, पंचायत समितीचे उपसभापती आबा वीर, शिवसेनेचे अ‍ॅड. नितीन कदम, शेतकरी संघटनेचे अनिल खोत यांच्यासह धरणग्रस्त भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उजनी धरण शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष दशरथ माने म्हणाले, की इंदापूरकरांच्या त्यागावर उजनी धरण निर्माण झाले आहे. २८ गावे पाण्याखाली गेली आहेत. उजनीच्या पाण्यावर इंदापूरकरांचा हक्क आहे. सध्या १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाला इंदापूरकरांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तरतूद नसताना उजनी धरणातील पाणी भीमा नदीतून व सीना माढा बोगद्यातून सोलापूरसाठी सोडण्यात येत आहे. इंदापूर तालुक्यातील ३४ हजार हेक्टर जमिनीस बारमाही पाणीपरवानगी होती. आजही २८ हजार हेक्टर क्षेत्रास बारमाही पाणीपरवानगी आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत जर पाणी खाली सोडण्यात आले, तर इंदापूरकरांना पाणीच शिल्लक राहणार नाही. शेतकऱ्यांना आत्महत्यांशिवाय पर्याय उरणार नाही. या वेळी मंगेश पाटील, प्रवीणभैया माने, महारुद्र पाटील, अंकुश पाडुळे व इतरांची भाषणे झाली. तानाजी काळे यांनी प्रास्ताविक केले. न्यायालयाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्षउजनी धरणामध्ये खेड तालुक्यातील चासकमान आणि भामा-आसखेड धरणांतून पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात येथील लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, मंगळवारी यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्यात यावे, अशी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे विनंती केली होती. परंतु त्याबाबत निर्णय न घेता पाणी सोडण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याने खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी गेल्या आठवड्यात झाली. यावर मंगळवारी निर्णय होणार आहे.