शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

आम्हाला राजकारणात यायचं नाही; तिकडं लय पैसा लागतो - मनोज जारांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:25 AM

राजकारणात नाही यायचं, आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत, आम्हाला फक्त आरक्षण द्या

पुणे: लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला. तोच उत्साह, जल्लोष पाटलांवर ती फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. आज ते शहराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मनोज जरांगे यांचा मोर्चा पुणे शहरातील उपनगरातून मोठ्या संख्येने पुढे जात आहे. चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मोर्चामध्ये पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तुम्ही राजकारण येणार आहात का? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी तिकडं लय पैसा लागतो असं सूचक वक्तव्य केलं आहे. 

पाटील म्हणाले, आम्ही सामान्य माणूस आहोत. आम्हाला राजकारणात यायचं नाही. तिकडं लय पैसा लागतो. ते आपलं काम नाही. आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत. आम्हाला फक्त आरक्षण द्या.  मुंबईत जमावबंदी आहे तरी तुम्ही एवढा मोर्चा घेऊन तिकडं चालला आहात? असे विचारले असता जारांगे पाटील म्हणाले, आमच्यासाठी जमावबंदी आहे असं काही नाही. मुंबईच्या वाहनांना प्रवेश नाही असंही काही नाही. ते मोठं शहर आहे. विविध कारणास्तव तिकडं जमावबंदी लागू केली जाते. आम्हाला मुंबईला जायची हौस नाहीये. शासनाने सांगितलं कि, ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. त्या वाटप केले पाहिजेत 

सध्या संपूर्ण समाज रस्त्यात उभा आहे. आमची नवीन काही मागणी नाही. इतका मोठा समुदाय येतोय. त्यांनी दिलेल्या शब्दावर आम्ही येतोय पण तेच काम करत नाहीयेत. ७ महिने सरकाराला वेळ दिला आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या वितरित का केल्या नाहीत. कायदा बनवणारे आले होते त्यांचा शब्द होता तो पाळला नाही. कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे. तर मग ओबीसी बांधवाना नोंदी मागितल्या नाहीत. आम्हाला मात्र नोंदी मागत आहेत. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं. 

आम्ही कोणालाही वेठीस धरले नाही

रोजच जगणं सुरळीत व्हावं यासाठीच आम्ही आरक्षण मागतोय. तुमच्या दारातून आम्ही १ दिवसापुरते आलोय. आम्ही तुमच्या दारातून एकदा चाललोय. तुम्ही फक्त १ तांब्या पाणी द्या. आम्ही कोणालाही वेठीस धरले नाही. तुमच्या मोठ्या शहरातून एक रस्ता आम्हाला द्या. 

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOBCअन्य मागासवर्गीय जाती