शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
2
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
3
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
4
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
5
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
6
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलां! (VIDEO)
7
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
8
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
9
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
10
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
11
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
12
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
13
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
14
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
15
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
16
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
17
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
18
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
19
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
20
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!

माती संवर्धनासाठी जागतिक धोरण हवे; सद्गुरू यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 5:40 AM

‘मातीच्या संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर धोरणाची गरज आहे. राज्याच्या व देशांच्या सीमांवरील वाद ही केवळ एक मानवी समस्या आहे. आपण सोयीसाठी एक रेषा आखतो आणि तीच योग्य आहे, असे समजतो.

पुणे :

‘मातीच्या संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर धोरणाची गरज आहे. राज्याच्या व देशांच्या सीमांवरील वाद ही केवळ एक मानवी समस्या आहे. आपण सोयीसाठी एक रेषा आखतो आणि तीच योग्य आहे, असे समजतो. पृथ्वी एक केक आहे आणि त्या केकचा एक तुकडा घेऊन आपली जबाबदारी संपली, असे समजत असाल तर ते योग्य नाही. सूक्ष्मजीवांचे जीवन ही एक जागतिक प्रक्रिया आहे. त्यामुळे माती वाचवा (सेव्ह सॉईल) ही चळवळ सध्याचे धोरण बदलण्याचा एक जागतिक प्रयत्न आहे,’ असे प्रतिपादन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले. 

जगातील २६ देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरूंनी माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ग्राविटास फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, टॉपवर्थ ग्रुपचे अध्यक्ष अभय लोढा, यूपीएल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ उपस्थित होते.

सद्गुरू म्हणाले, ‘माती आपल्या भौतिक अस्तित्वाचा स्त्रोत आहे. मातीत अब्जावधी सूक्ष्मजीव असतात. त्यांचे जीवन एक जटील प्रक्रिया आहे. ती वाढत गेल्यानंतर एक जीवन तयार होते. त्यामुळे मानवाच्या जीवनाचे मूळही त्यातच आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी कवक, अल्गी यांनी सूर्यप्रकाशापासून अन्न कसे तयार होते, ते शोधून काढले. त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. त्यावेळी वातावरणात केवळ एक टक्का ऑक्सिजन होता. आता तो २१ टक्के आहे. हे केवळ प्रकाश संश्लेषणामुळे झाले. मात्र, गेल्या हजार वर्षांत पृथ्वीवरील ८५ टक्के प्रकाश संश्लेषण नष्ट झाले आहे.’ माती ही आपली माता; पण आपण मातीला साधन (रिसोर्स) मानायला लागलो आहोत, अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले, अनेक देशांनी मातीला एक निष्क्रिय वस्तू गृहित धरले आहे. आपल्या देशातही हीच परिस्थिती आहे. 

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- सध्या देशात व जगभर असहिष्णूता व द्वेषाचे वातावरण आहे. त्यावर तुम्ही काय उपाय सुचवाल, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘देशांमधील तसेच समाजातील तणावाबाबत बोलायचे झाल्यास सध्याचे वातावरण गेल्या हजार वर्षांपेक्षा चांगले आहे. इतिहास तपासा. - तेव्हाच्या तुलनेत आपण आता शांततेत व सौहार्दाने जगत आहोत. सध्याचा तणाव फक्त टीव्हीच्या स्टुडिओमध्ये दिसतो. तुम्ही जर पुण्याच्या रस्त्यांवरून फिरलात तर तुम्हाला हा तणाव दिसणार नाही. - देशातही तीच स्थिती आहे. काही विघ्नसंतोषी लोकांना अवास्तव महत्त्व दिले जाते. हे चुकीचे आहे. मीडियाने सकारात्मक गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. जुन्हा जखमांवरील खपल्या काढत बसू नये.’

सद्गुरूचा तरुणांसारखा उत्साह थक्क करणारा आहे. जनजीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. राष्ट्रप्रेम आणि विश्वप्रेमातून त्यांनी अनोखे चैतन्य निर्माण केले आहे. लहान मुले, मोठी माणसे असोत, राजकारणी असोत की कलाकार, प्रत्येक संवेदनशील माणसाला त्यांनी सामावून घेतले आहे. झोपलेल्या समाजाला, व्यवस्थेला सद्गुरुंनी जागे केले आहे. आपल्या देशात सद्गुरुंची कमतरता नाही. मात्र, खऱ्या अर्थाने सद्गुरू होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सद्गुरुंनी कायम कृतीला महत्त्व दिले आहे. संपूर्ण विश्व प्रकाशमान करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सद्गुरुंच्या ‘माती वाचवा’च्या चळवळीत आता ‘लोकमत’ परिवारही सहभागी झाला आहे. कोरोना काळात रक्तदानाच्या माध्यमातून ‘लोकमत’ने राज्यभरात मोठी चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि माती वाचविणे यासाठी ‘लोकमत’तर्फे यापुढेही नक्कीच पुढाकार घेतला जाईल.- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत.

टॅग्स :Puneपुणे