शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आगामी विधानसभा निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच लढविणार- दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:25 IST

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) देशभरात ४०० जागा मिळतील असे वातावरण होते. पण तसे झाले नाही. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर अनेक बदल होण्याचा अंदाज असल्याचेही ते म्हणाले....

पुणे :महायुतीतील सर्व पक्षांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केली आहे. महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. अधिवेशन आणि आचारसंहिता यामध्ये दोन महिने जातील. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी धोरण आखले जात आहेत, असे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) देशभरात ४०० जागा मिळतील असे वातावरण होते. पण तसे झाले नाही. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर अनेक बदल होण्याचा अंदाज असल्याचेही ते म्हणाले.

सहकार विभागाच्या विविध बैठकांसाठी पुणे दौऱ्यावर आले असता सोमवारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘महायुतीच्या माध्यमातून आम्ही विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मिळून निर्णय घेतात. मी त्या धोरणात नसतो. तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील. अधिवेशन आणि आचारसंहिता यामध्ये दोन महिने जातील. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी धोरण आखले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी शरद पवारांना सहानुभूती मिळत आहे, हे माझे सामान्य वक्तव्य होते. मी कुठेही असलो तरी माझ्या वाट्याला येणारे काम मी प्रामाणिकपणे करतो. श्रेय आणि अपयश याचा विचार करीत नाही याकडेही वळसे पाटील यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPuneपुणेvidhan sabhaविधानसभा