शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजगुरूनगर घटनेच्या नराधमास फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू - रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:20 IST

आपल्या परिसरामध्ये कोणत्याही भागांमध्ये नवीन व्यक्ती बाहेरून राहिला आल्यास तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला असली पाहिजे

पुणे : राजगुरूनगरमधील एका बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कार्तिकी सुनील मकवाने (वय ९ वर्षे), दुर्वा सुनील मकवाने (वय ८ वर्षे, दोन्ही रा. राजगुरुनगर) अशी मृतांची नावे असून, याप्रकरणी अजय दास (वय ५४ वर्षे, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे. त्यांनतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी बैठक झाली.  त्यांनी दोन चिमुकल्यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांशी चर्चा केली आहे. यावेळी आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले आहे. 

चाकणकर म्हणाल्या, राजगुरूनगर व लोणावळा येतील घटना ही दुर्दैवी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेल. आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा गैरफायदा घेत होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली. एसपी पंकज देशमुख आणि त्यांचे सर्व टीम चांगल्या पद्धतीने तपास कार्य करत आहे. आरोपीला म्हणजे रात्री ९ वाजून ६ मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे.  रात्री पावणे बारा वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केलं होतं. 

पण रात्री पावणे बारा वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या पॅरलमध्ये या दोन्ही मुलींचं मृतदेह आढळून आले. संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर जर सगळे रेल्वे स्टेशन्स असतील किंवा पश्चिम बंगाल कडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल. या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या आणि पाहटे चार वाजता म्हणजे साडेचार तासामध्ये त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक झालेली आहे यामध्ये अटक केल्यानंतर आरोपी वरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहे. यामधे आरोपीला फाशी मिळेल यासाठी पाठपुरावा करू असे चाकणकर यांनी सांगितले आहे. 

परराज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा 

आम्ही मागणी करणार आहोत की, आपल्या भागामध्ये आलेला नागरिक परराज्यातून आले असतील किंवा बाहेरून आले असेल. त्याची माहिती तातडीने आपल्या जवळच्या संबंधित पोलीस विभागाला कळवा. सोसायटीमध्ये नवीन राहिला आलेली व्यक्ती असेल. ग्रामपंचायत पंचायत समितीच्या भागांमध्ये असेल,  प्रभागांमध्ये असेल. आपल्या परिसरामध्ये कोणत्याही भागांमध्ये नवीन व्यक्ती बाहेरून राहिला आल्यास तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला असली पाहिजे. या सगळ्या घटनांमध्ये जवळच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याच आपल्याला पाहायला मिळतात. राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही त्याचा पाठपुरावा करून या अगोदर देखील कोल्हापूरच्या गावात जी अत्याचाराची घटना घडली त्यातल्या आरोपीलाही फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडRupali Chakankarरुपाली चाकणकरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार