शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

डाव्या विचारांच्या विराेधात लढा उभा करावा लागेल : सरसंघचालक माेहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:53 AM

भ्रमाचा पडदा फाडावा लागेल व डाव्या विचारसरणीविराेधात लढा उभा करावा लागेल, असे मत सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले....

पुणे : आता वैचारिक लढाईचे स्वरूप बदलले आहे. अस्त्र बदलतात; पण प्रवृत्ती तीच असते. जे आहे ते तसे नाही असा भ्रम उत्पन्न केला की त्याला म्हणतात परर्सेप्शन. आता फॅक्ट आवश्यक नसून इंटरप्रिटेशन महत्त्वाचे. म्हणून या लढाईत सर्वांनाच लढावे लागेल. भ्रमाचा पडदा फाडावा लागेल व डाव्या विचारसरणीविराेधात लढा उभा करावा लागेल, असे मत सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले.

अभिजित जाेगलिखित व दिलीपराज प्रकाशन प्रकाशित ‘जगाला पाेखरणारी वाळवी’ या पुस्तकाचा प्रकाशन साेहळा सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बाॅयाेसिसच्या विश्वभवन सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. शांतीश्री पंडित व इतर मान्यवर उपस्थित हाेते.

भागवत पुढे म्हणाले की, आपण डावी वाळवी म्हणताे. आज डाव्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. हे अहंकारी लाेक आहेत त्यांना जगावर आपली पकड हवीय. ते केवळ हिंदूविराेधी नसून जगातील सर्व मंगलांच्या विराेधी आहेत. त्यांना जे माझे आहे ते माझे; परंतु इतरांचेही मला हवे हा त्यांचा स्वभाव आहे, असे ते म्हणाले.

ज्या प्रकारे आईवडिलांकडून आपल्यापर्यंत परंपरा आली; पण, आता ती मुलांपर्यंत पाेहोचत नाही. सर्वांना मंगल करणारी आपली संस्कृती आहे. त्या मुळाकडे आपल्याला आणि आपल्या पिढीला आणावे लागेल. थाेडं डाेळे उघडून चारी बाजूला पाहिले तर लक्षात येते. गांधीजींचे हिंदस्वराज वाचा. त्यांना याची कल्पना आली. सावरकरांनाही यांची कल्पना आली हाेती.

भाषा बदलली म्हणजे भाव बदलतात. ही प्रत्येकाची लढाई आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे टेक्सबुक आहे, असे स्पष्ट करत हे सगळीकडे पाेहोचले पाहिजे. सर्व देशात जायला हवे. जाे आपल्यापेक्षा दुर्बल आहे त्याचा पाहिजे तितका उपयाेग करून घ्यायचा आणि त्याला फेकून द्यायचे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, असा विचाराचा पाया असल्याचीही टीका त्यांनी केली.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतPuneपुणे