शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

कोरोनात पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या 'प्लेसमेंट'चे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2022 1:00 PM

कोरोनाने विद्यापीठांकडून देण्यात आलेल्या गुणपत्रिकेचे महत्त्व कमी केल्याची चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात होत आहे

पुणे : कोरोनाचे (corona) सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कामगार भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे. मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड न करता आता कंपनी स्वतःच परीक्षा घेऊन विद्यार्थ्याची पात्रता तपासत आहे. त्यामुळे कोरोनाने विद्यापीठांकडून देण्यात आलेल्या गुणपत्रिकेचे महत्त्व कमी केल्याची चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात होत आहे.

गेल्या दोन वर्षांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह सर्वच अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) करता आले नाही. (प्रात्यक्षिक) करता आले नाही. त्यातच पद्धतीने घेण्यात आल्या. बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे (एमसीक्यू) झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे नोकरी कोणाला द्यावी, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला. त्यामुळे  कंपन्यांनी नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वत:च परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे.

कंपन्यांकडून प्लेसमेंट देताना विद्यार्थ्यांचा पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंतची शैक्षणिक प्रगती पाहिली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षा नीटपणे दिल्या नाहीत. तसेच एका वर्गातील बहुतांश सर्व विद्यार्थ्यांना ८० ते ९० टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे कोरोनाकाळाच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अधिक आहे की इतर वर्षीसुद्धा संबंधित विद्यार्थ्यांची प्रगती चांगली होती हे कटाक्षाने तपासले जात आहे.

कोरोनाचे निर्बंध उठले असले तरी आयटी कंपन्यांना आपल्या कामगारांकडून ऑनलाईन पद्धतीने करून घेणे परवडत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून लहान-मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लेसमेंट होत आहेत. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. परिणामी कंपन्यांकडून प्लेसमेंट पूर्वी विद्यार्थ्यांची एक 'बेसिक टेस्ट' घेतली जात आहे. त्यात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवड करूनच त्यांना कंपनीत काम करण्यासाठी पुढील प्रशिक्षण दिले जात आहे.

- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड