शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार काय करतंय? अधिवेशनात धंगेकरांचा सवाल

By राजू हिंगे | Published: July 03, 2024 6:40 PM

पाणीटंचाईच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी पुण्याला २१ टीएमसी पाणी साठा मंजूर करावा

पुणे: पावसाला सुरू असून सुद्धा पुण्याच्या अनेक भागात पाणी मिळत नाही. पाण्यापासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. २४ बाय ७ पाणी योजना रखडली आहे. काही भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि पुणेकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाय योजना करीत आहे , असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला.

पावसाळी अधिवेशन पुण्याचा पाणी प्रश्न मांडून आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारचे लक्ष वेधले. धंगेकर म्हणाले, मी सातत्याने पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे सरकारचे, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांसह पुणे शहराला पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.‌ पुण्याचा पाण्याचा प्रश्न जटिल होत आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट राहिले आहे. त्यातच स्वच्छ पाणी नागरिकांना मिळत नाही. अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने रोगराई पसरत चालली आहे. म्हणून समान पाणीपुरवठा योजनेकडे आणि शुद्ध पाणीपुरवठ्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. टँकर माफियावर नियंत्रण आणले पाहिजे. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे रोगराई वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. पण सरकार पावले उचलताना दिसत नाही अशी नाराजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.

पुण्यासाठी २१ टीएममसी पाणी साठा मंजूर करा

वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याला पाणीटंचाईची झळ भासत आहे. त्यामुळे पालिकेने पुरेशा पाणीसाठ्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. पण, तत्कालीन राज्य सरकारने पुणे महापालिकेच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पुणेकरांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या गावांना अतिरिक्त पाणी मंजूर होणे हेही आवश्यक होते. पण, अद्याप वाढीव पाणीसाठा शासनाने मंजूर केला नाही. याचेही परिणाम पुणेकरांना सोसावे लागत आहेत. या त्रासातून मुक्त होण्यासाठी पुण्याला २१ टीएमसी पाणी साठा मंजूर करावा, असेही आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसwater shortageपाणीकपातBJPभाजपाRainपाऊस