शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

बाबरी पाडली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं?; रुपाली पाटील यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 12:48 IST

बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? बाबरी पाडली त्यावेळी आपण तिथं उपस्थित होतो, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल झालेल्या भाजपाच्या सभेत केला.

पुणे-

बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? बाबरी पाडली त्यावेळी आपण तिथं उपस्थित होतो, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल झालेल्या भाजपाच्या सभेत केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी खोचक टीका केली आहे. बाबरी पाडली गेली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं? असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका यामागे भाजपाचा हात आहे. मुख्यमंत्रीपदाची आस लावून बसलेले देवेंद्र फडणवीस हे सर्व करत आहेत, असा आरोप रुपाली पाटील यांनी यावेळी केला. राज ठाकरे यांच्या कालच्या औरंगाबादमधील भाषणात सर्वाधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर होती. त्यावरही रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

"काही प्रवृत्तींचा राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे. मात्र तसं राज्यात होणार नाही. महाविकास आघाडी यासाठी भक्कम आहे. राज ठाकरेंच्या भाषणात अनेक मुद्दे आले आहेत आणि त्याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या भाषणामुळे जर काही घटना झाल्या तर कारवाई होईलच", असं रुपाली पाटील म्हणाल्या. 

राष्ट्रवादीमध्ये सर्व धर्माचे लोक आहेत. ते जातीयवादी अजिबात नाहीत. अनेक धर्माचे आणि जातीचे लोक आज पक्षात काम करत आहेत, असं रुपाली पाटील म्हणाल्या. राज्यात जातीजातींमध्ये विष कालवण्याचं काम शरद पवार यांनी केलं असा आरोप राज ठाकरे यांनी सभेत केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रुपाली पाटील प्रत्युत्तर दिलं. 

"ज्या पक्षात सर्व जाती-धर्माचे जिथं ब्राम्हण, मराठा, मुस्लिम, हिंदू, शीख आणि ओबीसीच्या पोटजाती आहेत. म्हणजेच अठरा पगड जातीचे पदाधिकारी पक्षात काम करत आहेत. अशा पक्षाचा अध्यक्ष जातीयवादी कसा काय असू शकतो असा प्रश्न मला पडतो", असं रुपाली पाटील म्हणाल्या. 

२१ व्या शतकात जाती-धर्माचं राजकारण दुर्दैवी"लोकमान्य टिळक जरी ब्राम्हण होते तरी ते ब्राम्हण म्हणून राहिले नव्हते. ते सर्वधर्मासाठी काम करत होते. ते समाजसुधारक होते. त्यांनी जात पाहिली नव्हती. जे हुतात्मे आहेत त्यांनी त्यांचं त्यांचं काम केलं. पण त्या जातीचा आहे म्हणून त्यांनी ते काम केलं हे आता आपण बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जर लोकमान्य टिळकांनी बांधली असेल तर ती शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. लोकमान्य टिळकांना जेव्हा अटक झाली होती. तेव्हा ज्योतिबा फुले हे जामीनदार होते. मग त्यावेळी टिळकांना अटक झाली मग त्यांच्या समाजातील इतर कुठे होते? का महात्मा ज्योतिबा फुलेंनीच जामीन दिला? असं आपण घेऊन बसणार का? आता २१ व्या षटकात जातीधर्माचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे", असं रुपाली पाटील म्हणाल्या.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस